शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

कष्टकरी महिलांना ‘कर्ते’पणाची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST

पुणे : पालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विधवा साहाय्य योजनेअंतर्गत दिली जाणारी १५ हजार रुपयांची मदत कष्टकरी महिलांच्या मृत्यूपश्चात ...

पुणे : पालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विधवा साहाय्य योजनेअंतर्गत दिली जाणारी १५ हजार रुपयांची मदत कष्टकरी महिलांच्या मृत्यूपश्चात दिली जावी, अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीने महिला व बालकल्याण समितीकडे करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत नवऱ्याच्या मृत्यू पश्चात पत्नीला एकदा १५ हजार रुपये दिले जातात. या रकमेतून पतीच्या मृत्यूनंतर महिलेला काही उद्योग सुरू केला जावा अशी अपेक्षा असते. कष्टकरी महिला आपले कुटुंब जगवीत असतात. ही ‘कर्ती बाई’ वारली तर तिच्या मुलांना काहीच मिळत नाही. ह्याचे कारण, महिला रोजगार, नोकरी अथवा व्यवसाय करत असल्या तरी त्यांना समाजात कर्तीचा दर्जा दिला जात नाही. कर्ता म्हटले की समाजासमोर पुरुषांचे चित्र पुढे येते.

परंतु, कष्टकरी बाया या कर्त्या असतात. त्यांनी कष्ट केले नाहीत तर कुटुंब जगणार नाही. कचरा उचलणे, काच, पत्रा, भंगार गोळा करणे, घरकामगार आदी कष्टाच्या कामामध्ये असलेल्या महिलांचे श्रम पुरुषांच्या श्रमामध्येच मोजले जातात. ऊसतोड मजुरांचा अर्धा कोयता, वीटभट्टी आणि बांधकामामध्ये जोडप्याचा सहभाग अशी अनेक उदाहरणे आहेत.

त्यामुळे कष्टकरी महिलांचा मृत्यू झाल्यास त्यांचे कर्तेपण मान्य करून त्यांच्या मुलामुलींना विधवा साहाय्य योजनेतील रक्कम दिली जावी, अशी मागणी पंचायतीने केली आहे. संघटनेच्या सभासदांनी पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांना यासंदर्भात मागणीचे निवेदन दिल्याचे संघटनेच्या पौर्णिमा चिकरमाने यांनी सांगितले.