शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

विलंबानंतर विद्यार्थ्यांना मदत

By admin | Updated: April 12, 2017 04:14 IST

काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विलंबानंतर महापालिका प्रशासन आता इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेले शैक्षणिक अर्थसाह्य अदा करणार

पुणे : काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विलंबानंतर महापालिका प्रशासन आता इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेले शैक्षणिक अर्थसाह्य अदा करणार आहे. इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांची आता ११ वीचीही परीक्षा झाली आहे, तर इयत्ता १२ वीचे विद्यार्थी आता महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या ६ वर्षांपासून महापालिकेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाह्य म्हणून मदत केली जाते. ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण ही याची अट आहे. इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांला १५ हजार व १२ वी तील विद्यार्थ्यांला २५ हजार रुपये देण्यात येतात. ‘मौलाना अबूल कलाम आझाद’ व ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजना’ असे या दोन्ही योजनांची नावे आहेत. दोन्ही परीक्षांचे निकाल लागले, की त्यासाठी आॅनलाईन अर्ज मागितले जातात. त्यात गुणपत्रिकेसह पुढील वर्षासाठी प्रवेश घेतला आहे, याची कागदपत्रेही सादर करावी लागतात. शैक्षणिक अर्थसाह्य असल्यामुळे अर्जांची छाननी होऊन त्याच वर्षात मदत मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक वर्षी या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वर्षापेक्षाही जास्त कालावधी लागतो.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना महापालिका आता वर्षानंतर हे पैसे अदा करणार आहे. त्यावर्षी या योजनेसाठी १० हजार ८९५ अर्ज आले होते. त्यातील ८ हजार ३३४ अर्ज इयत्ता १० वीचे तर २ हजार १४९ अर्ज इयत्ता १२ वीचे आहेत. ४२२ अर्जांची छाननी अद्याप बाकी आहे. ही छाननी लवकरच पूर्ण होईल, असे नागरवस्ती विकास विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांनी सांगितले. मागील वर्षी या योजनेसाठी १८ कोटी रुपये खर्च आला होता. यावेळी तो जास्त येईल, असे ते म्हणाले. सरकारच्या आदेशाप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक मागवून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता या योजनेचा जाहीर कार्यक्रम वगैरे न करता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम धनादेशाने जमा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी) - यापूर्वी या योजनेसाठी नगरसेवक आपापल्या प्रभागांमधील विद्यार्थ्यांचे अर्ज आणून देत. मदतीचे धनादेश आपल्यामार्फत जाहीर कार्यक्रमात द्यावेत, असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जात. त्यामुळे या योजनेला विलंब होत असे. आता धनादेश थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करायचे असूनही पुन्हा विलंबच होत आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने विलंब होतो, असे सांगण्यात येते.