शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अंधश्रद्धेचा कहर :रस्त्याच्या शेजारी बळी ठेवत लिंबू मिरची ठेवल्याचा प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 21:28 IST

आधुनिक युगात आणि पुरोगामी  राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला.

पुणे :आधुनिक युगात आणि पुरोगामी  राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला. या प्राण्यांच्या मुंडक्या भोवती नारळ, लिंबे व अघोरी कृत्य करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले आहे. या प्रकारामुळे या परिसरात नागरिक भयभीत झाले आहे. 

कोणीतरी अज्ञात इसमांनी रस्त्याच्या कडेलाच हा सर्व जादू टोण्याचा प्रकार केला असून असे अघोरी कृत्य करणा-यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी  नंदिनी जाधव, अंधश्रद्धा निमृल समितीचे  कार्याध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. ज्या वस्तीजवळ ही घटना घडली आहे त्या  मुखेकर वस्तीतील जागरूक नागरिकांनी कुठलीही भीती अथवा न घाबरण्याचे आवाहन केले आहे. 

या बाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास काही नागरिक शेतीला पाणी देण्यासाठी  दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला  एका मोटारीतून आलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावर हा प्रकार करत असल्याचे त्यांना दिसले. यात काही महिला व लहान मुलगी ही असल्याचे  त्यांनी सांगितले. पण खरा प्रकार सकाळी उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आला.  पुरुष व महिलांच्या नावाने  कपडे, नारळ, लिंबांचे हार, व इतर साहित्य तसेच पण तीन बोकडांचा बळी देऊन त्यांचे मुंडके या ठिकाणी ओळीत ठेवून त्यांना लिंबाचे हार घालण्यात आले होते.  

सहा महिन्यांपूर्वीही घटला होता प्रकार    

   मागील सहा महिन्यापूर्वी मलठण येथे देखील जादूटोण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्थानिक ग्रामस्थांनी प्रभोधन करून हे सर्व थोतांड असल्याचे पटवून दिले होते. तेथे जादू टोण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सर्वांसमक्ष जाळून टाकण्यात आले होते. प्रत्यक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना अशा अघोरी घटना घडतातच कशा ? व संबंधित यंत्रणा अशा लोकांचा बंदोबस्त का करत नाही असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केला आहे.    नागरिकांनी कुठल्याही प्राकाराची भीती बाळगण्याचे कारण नाही तसेच पोलिसांनी देखील या घटनेचा छडा लावून अशा अघोरी कृत्य करणा-या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी अनिसच्या नंदिनी जाधव, तान्हाजी मुखेकर व स्थानिक ग्रामस्थानी केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर