शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अंधश्रद्धेचा कहर :रस्त्याच्या शेजारी बळी ठेवत लिंबू मिरची ठेवल्याचा प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 21:28 IST

आधुनिक युगात आणि पुरोगामी  राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला.

पुणे :आधुनिक युगात आणि पुरोगामी  राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला. या प्राण्यांच्या मुंडक्या भोवती नारळ, लिंबे व अघोरी कृत्य करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले आहे. या प्रकारामुळे या परिसरात नागरिक भयभीत झाले आहे. 

कोणीतरी अज्ञात इसमांनी रस्त्याच्या कडेलाच हा सर्व जादू टोण्याचा प्रकार केला असून असे अघोरी कृत्य करणा-यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी  नंदिनी जाधव, अंधश्रद्धा निमृल समितीचे  कार्याध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. ज्या वस्तीजवळ ही घटना घडली आहे त्या  मुखेकर वस्तीतील जागरूक नागरिकांनी कुठलीही भीती अथवा न घाबरण्याचे आवाहन केले आहे. 

या बाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास काही नागरिक शेतीला पाणी देण्यासाठी  दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला  एका मोटारीतून आलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावर हा प्रकार करत असल्याचे त्यांना दिसले. यात काही महिला व लहान मुलगी ही असल्याचे  त्यांनी सांगितले. पण खरा प्रकार सकाळी उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आला.  पुरुष व महिलांच्या नावाने  कपडे, नारळ, लिंबांचे हार, व इतर साहित्य तसेच पण तीन बोकडांचा बळी देऊन त्यांचे मुंडके या ठिकाणी ओळीत ठेवून त्यांना लिंबाचे हार घालण्यात आले होते.  

सहा महिन्यांपूर्वीही घटला होता प्रकार    

   मागील सहा महिन्यापूर्वी मलठण येथे देखील जादूटोण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्थानिक ग्रामस्थांनी प्रभोधन करून हे सर्व थोतांड असल्याचे पटवून दिले होते. तेथे जादू टोण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सर्वांसमक्ष जाळून टाकण्यात आले होते. प्रत्यक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना अशा अघोरी घटना घडतातच कशा ? व संबंधित यंत्रणा अशा लोकांचा बंदोबस्त का करत नाही असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केला आहे.    नागरिकांनी कुठल्याही प्राकाराची भीती बाळगण्याचे कारण नाही तसेच पोलिसांनी देखील या घटनेचा छडा लावून अशा अघोरी कृत्य करणा-या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी अनिसच्या नंदिनी जाधव, तान्हाजी मुखेकर व स्थानिक ग्रामस्थानी केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर