शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नीरा खोऱ्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:52 IST

राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बारामती - राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ९ जुलैपर्यंत भाटघर २५ टक्के, नीरा देवघर २६ टक्के, वीर २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाळी आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बारामतीच्या बागायती परिसराला नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानली जाते. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर व परिसरात अल्पपाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडे बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९ जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. भाटघर धरण- ६१६४ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. तर सध्या या धरणात ३७६ द.ल.घ.फू.ने पावसाचे पाणी येत आहे. नीरा देवघर धरणात ३२०७ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. या धरणात २७२ द.ल.घ.फू.ने पाणी येत आहे. वीर धरणात २६१३ द.ल.घ.फू. पाणीसाठा असून, २१२ द.ल.घ.फू.ने धरणात पावसाचे पाणी येत आहे.पाटबंधारे खात्याचे बारामती उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की १३ मार्च ते २८ जूनपर्यंत नीरा डावा कालवा सुरू होता. गेल्या वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याची मिळाली. यंदादेखील शेतीला पाच आवर्तने देण्याची तयारी आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येईल.२१५ दशलक्ष घनफूट नाझरेत पाणीसाठा...नाझरे धरणात सध्या २१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आॅक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. बारामती मोरगाव नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना या जलाशयावर अवलंबून आहे. बारामती तालुक्यातील आंबी बु, मोरगाव, तरडोली, लोणी पाटी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव, बाबुर्डी, आंबी खुर्द, काºहाटी, जळगाव क.प., जळगाव सुपे आदी गावांना नाझरे जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा या गावांसाठी आॅक्टोबरपर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे सध्यातरी पाणीटंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या