शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

नीरा खोऱ्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:52 IST

राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बारामती - राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ९ जुलैपर्यंत भाटघर २५ टक्के, नीरा देवघर २६ टक्के, वीर २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाळी आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बारामतीच्या बागायती परिसराला नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानली जाते. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर व परिसरात अल्पपाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडे बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९ जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. भाटघर धरण- ६१६४ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. तर सध्या या धरणात ३७६ द.ल.घ.फू.ने पावसाचे पाणी येत आहे. नीरा देवघर धरणात ३२०७ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. या धरणात २७२ द.ल.घ.फू.ने पाणी येत आहे. वीर धरणात २६१३ द.ल.घ.फू. पाणीसाठा असून, २१२ द.ल.घ.फू.ने धरणात पावसाचे पाणी येत आहे.पाटबंधारे खात्याचे बारामती उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की १३ मार्च ते २८ जूनपर्यंत नीरा डावा कालवा सुरू होता. गेल्या वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याची मिळाली. यंदादेखील शेतीला पाच आवर्तने देण्याची तयारी आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येईल.२१५ दशलक्ष घनफूट नाझरेत पाणीसाठा...नाझरे धरणात सध्या २१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आॅक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. बारामती मोरगाव नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना या जलाशयावर अवलंबून आहे. बारामती तालुक्यातील आंबी बु, मोरगाव, तरडोली, लोणी पाटी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव, बाबुर्डी, आंबी खुर्द, काºहाटी, जळगाव क.प., जळगाव सुपे आदी गावांना नाझरे जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा या गावांसाठी आॅक्टोबरपर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे सध्यातरी पाणीटंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या