शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नीरा खोऱ्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:52 IST

राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बारामती - राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ९ जुलैपर्यंत भाटघर २५ टक्के, नीरा देवघर २६ टक्के, वीर २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाळी आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बारामतीच्या बागायती परिसराला नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानली जाते. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर व परिसरात अल्पपाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडे बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९ जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. भाटघर धरण- ६१६४ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. तर सध्या या धरणात ३७६ द.ल.घ.फू.ने पावसाचे पाणी येत आहे. नीरा देवघर धरणात ३२०७ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. या धरणात २७२ द.ल.घ.फू.ने पाणी येत आहे. वीर धरणात २६१३ द.ल.घ.फू. पाणीसाठा असून, २१२ द.ल.घ.फू.ने धरणात पावसाचे पाणी येत आहे.पाटबंधारे खात्याचे बारामती उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की १३ मार्च ते २८ जूनपर्यंत नीरा डावा कालवा सुरू होता. गेल्या वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याची मिळाली. यंदादेखील शेतीला पाच आवर्तने देण्याची तयारी आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येईल.२१५ दशलक्ष घनफूट नाझरेत पाणीसाठा...नाझरे धरणात सध्या २१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आॅक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. बारामती मोरगाव नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना या जलाशयावर अवलंबून आहे. बारामती तालुक्यातील आंबी बु, मोरगाव, तरडोली, लोणी पाटी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव, बाबुर्डी, आंबी खुर्द, काºहाटी, जळगाव क.प., जळगाव सुपे आदी गावांना नाझरे जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा या गावांसाठी आॅक्टोबरपर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे सध्यातरी पाणीटंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या