शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा खोऱ्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:52 IST

राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बारामती - राज्यात सर्वत्र पावसाची धुवाधार सुरू असताना बारामती शहर व तालुका कोरडाच आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतक-यांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. मात्र, धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरूअसल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ९ जुलैपर्यंत भाटघर २५ टक्के, नीरा देवघर २६ टक्के, वीर २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाळी आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बारामतीच्या बागायती परिसराला नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानली जाते. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर व परिसरात अल्पपाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडे बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९ जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. भाटघर धरण- ६१६४ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. तर सध्या या धरणात ३७६ द.ल.घ.फू.ने पावसाचे पाणी येत आहे. नीरा देवघर धरणात ३२०७ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. या धरणात २७२ द.ल.घ.फू.ने पाणी येत आहे. वीर धरणात २६१३ द.ल.घ.फू. पाणीसाठा असून, २१२ द.ल.घ.फू.ने धरणात पावसाचे पाणी येत आहे.पाटबंधारे खात्याचे बारामती उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की १३ मार्च ते २८ जूनपर्यंत नीरा डावा कालवा सुरू होता. गेल्या वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याची मिळाली. यंदादेखील शेतीला पाच आवर्तने देण्याची तयारी आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येईल.२१५ दशलक्ष घनफूट नाझरेत पाणीसाठा...नाझरे धरणात सध्या २१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आॅक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. बारामती मोरगाव नळपाणीपुरवठा प्रादेशिक योजना या जलाशयावर अवलंबून आहे. बारामती तालुक्यातील आंबी बु, मोरगाव, तरडोली, लोणी पाटी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव, बाबुर्डी, आंबी खुर्द, काºहाटी, जळगाव क.प., जळगाव सुपे आदी गावांना नाझरे जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा या गावांसाठी आॅक्टोबरपर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे सध्यातरी पाणीटंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या