शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सिंचनासाठी सुनावणी १३ मार्च रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:25 IST

खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

कळस : खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्याची सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये कालव्यावरील अवलंबून असलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर शेतीला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली.भादलवाडी (ता. इंदापूर) येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, कळसचे सरपंच गणेश सांगळे, डॉ. संजीव लोंढे, बबन खारतोडे, पोलीस पाटील तुकाराम खाडे, तानाजी सांगळे, संदीप वायाळ, दत्तात्रय कन्हेरकर, प्रवीण कन्हेरकर, ज्ञानदेव कन्हेरकर, नाथाभाऊ कुतवळ, बापू भांडवलकर उपस्थित होते. खडकवासला कालव्यावरून पुणे शहराला नेहमीच अतिरिक्त पाणी दिले जात आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सिंचन अडचणीत आले आहे.गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी आवर्तन दिले जात नाही, त्यामुळे या भागातील पिके जळून गेल्याने मोठे नुकसान झाले होते, ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासकीय पातळीवर न्याय मागण्याचा प्रयत्न केला; मात्र शहरी भागाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील सिंचनावर अन्याय करण्यात आला.पुणे शहराचा पाणीवापर व मागणी वाढतच चालली असल्याने इंदापूर तालुक्यातील व दौंड,हवेली, बारामती या भागातील फळबागा व शेती अडचणीत आली आहे, त्यामुळे न्यायहक्क मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे यावर दोनदा सुनावणी झाली असून १३ मार्च रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट