शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सिंचनासाठी सुनावणी १३ मार्च रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:25 IST

खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

कळस : खडकवासला कालव्यावरील सिंचनासाठी प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्याची सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये कालव्यावरील अवलंबून असलेल्या सुमारे ६५ हजार हेक्टर शेतीला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली.भादलवाडी (ता. इंदापूर) येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, कळसचे सरपंच गणेश सांगळे, डॉ. संजीव लोंढे, बबन खारतोडे, पोलीस पाटील तुकाराम खाडे, तानाजी सांगळे, संदीप वायाळ, दत्तात्रय कन्हेरकर, प्रवीण कन्हेरकर, ज्ञानदेव कन्हेरकर, नाथाभाऊ कुतवळ, बापू भांडवलकर उपस्थित होते. खडकवासला कालव्यावरून पुणे शहराला नेहमीच अतिरिक्त पाणी दिले जात आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सिंचन अडचणीत आले आहे.गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी आवर्तन दिले जात नाही, त्यामुळे या भागातील पिके जळून गेल्याने मोठे नुकसान झाले होते, ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासकीय पातळीवर न्याय मागण्याचा प्रयत्न केला; मात्र शहरी भागाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील सिंचनावर अन्याय करण्यात आला.पुणे शहराचा पाणीवापर व मागणी वाढतच चालली असल्याने इंदापूर तालुक्यातील व दौंड,हवेली, बारामती या भागातील फळबागा व शेती अडचणीत आली आहे, त्यामुळे न्यायहक्क मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे यावर दोनदा सुनावणी झाली असून १३ मार्च रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट