शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : पेसा क्षेत्रात राहणाऱ्या बिगर आदिवासी समाजाला पेसा कायद्याच्या सवलती न मिळाल्यास येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : पेसा क्षेत्रात राहणाऱ्या बिगर आदिवासी समाजाला पेसा कायद्याच्या सवलती न मिळाल्यास येणाऱ्या सहकारी संस्थांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा पेसा हक्क कृती समितीचे खजिनदार व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम फदाले यांनी दिला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील शिनोली येथे पेसा हक्क कृती समितीची बैठक सामाजिक कार्यकर्ते आत्माराम बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी फदाले बोलत होते. या वेळी आमच्या मागण्यांकडे लोकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करीत असून सर्वच लोकप्रतिनिधींची भेट घेऊन व निवेदन देऊन सहा महिने उलटून गेले. पण तरी लोकप्रतिनिधी गांभीर्याने आमची अडचण लक्षात घेत नसून आमचा साधा विचार केला जात नाही. या पुढील काळात आमच्या मागण्याचा विचार झाला नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला.

या वेळी अनुसूची क्षेत्रात राहणाऱ्या प्रतिनिधींनी आपापल्या व्यथा मांडल्या. प्रत्येक जण पेसा कायदा हा क्षेत्रात कायम वास्तव्य असणाऱ्या ज्यांची शेती घरदार व्यवसाय कायम या भागात असून या भागाशी पारंपरिक नाळ जोडलेली आहे. ८००ते १००० वर्षांपासून आदिवासी समाजाबरोबर येथील बिगर आदिवासी लोक राहत असून दोन्ही समाजातील लोक बंधूभावाने राहत असताना पेसा कायद्याने व अनुसूची क्षेत्रामुळे आरक्षण वेगवेगळे का? याबाबत शासन दरबारी न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असे मत पेसा हक्क कृती समितीचे सचिव गौतम खरात यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी ज्येष्ठ सल्लागार आत्माराम बोऱ्हाडे, गंगापूर गावचे माजी सरपंच सीताराम लोहट, सामाजिक कार्यकर्ते हुसेन शेख, शरीफ पटेल, पांडुरंग ठोसर, युवा नेते विशाल भालेराव, हनिफ तांबोळी, अमोल अंकुश, भरत ठोसर, सचिव गौतम खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

‘‘वास्तविक पेसा कायदा हा त्या क्षेत्रात कायमस्वरूपी राहणाऱ्या ज्यांची शेती, घर, व्यवसाय तेथील चालीरिती, रूढीपरंपरा या बिगर आदिवासी समाजालापण माहीत आहेत व ते पाळतात. आतापर्यंत आदिवासी आणि इतर समाज गुण्यागोविंदाने राहत आहे, त्यांच्यात कधीही भेदभाव नाही म्हणून अनुसूची क्षेत्रात जो पेसा कायदा आहे त्याच्या सवलती व हक्क आणि न्याय बिगर आदिवासी समाजाला मिळाल्या पाहिजेत’’.

- आत्माराम बोऱ्हाडे, ज्येष्ठ सल्लागार पेसा हक्क कृती समिती

फोटो : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शिनोली येथे पेसा हक्क कृती समितीची बैठक झाली, यावेळी उपस्थित नागरिक.