शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

...तो ‘अनमोल’ ठेवा गमावला

By admin | Updated: March 28, 2015 01:03 IST

महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली.

पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली ‘गीतरामायण’ ही अजरामर कलाकृती साहित्यासह सांगीतिक विश्वात मैलाचा दगड ठरली. गीतरामायणातील प्रत्येक रचना ज्या नोटेशनवर बांधली गेली, त्या गीतांच्या सर्व नोटेशन एका वहीमध्ये लिहून ठेवण्याचा माझा शिरस्ता होता. मात्र, त्याचे ‘मूल्य’ न समजल्याने त्या वह्या अनवधानाने रद्दीमध्ये टाकल्या गेल्या. त्यामुळे एका उत्तुंग कलाकृतीचा अनमोल ठेवा गमाविल्याची सल आजही मनात असल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांनी व्यक्त केली. शनिवारी रामनवमीच्या दिवशी गीतरामायणाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त साधलेल्या संवादातून जोग यांनी गीतरामायणातील प्रत्येक रचनेच्या आठवणींचा कप्पा ‘लोकमत’शी बोलताना उलगडला. संगीतात कोणताही जडपणा जाणवू न देणे, अर्थपूर्ण चाली देणे ही बाबूजींची खासियत होती. ‘चला राघवा चला’ हे गीत स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजींना वेळ मिळाला नसल्याने ते संगीतबद्ध करण्याचे शिवधनुष्य कसे पेलले याची आठवण त्यांनी सांगितली. सुधीर फडके यांची मुंबईला केस चालली होती, त्यामुळे त्यांना गाणे संगीतबद्ध करण्यास वेळ नव्हता, तेव्हा तुम्ही हे गाणे कराल का? अशी विचारणा त्यांनी केली. संपूर्ण गाणं करणे हे माझ्यासाठी आव्हान होते, पण ते मी स्वीकारले. रेकॉर्डिंगच्या वेळी बाबूजी आले. गाणे ऐकून कसं वाटतंय सांगा, असे त्यांना म्हटले, ते गाणे बिहाग रागात बांधले होते.गदिमांकडून गाणे घेऊन येणे ही जबाबदारी माझ्यावर असायची. पंचवटीला गेल्यावर, ‘तू जरा बस’ असे म्हणून केवळ पंधरा मिनिटांत ते गाणे कागदावर उमटवीत असत. एकटाकी लेखन काय असते हे त्यांच्याकडे पाहून उमगायचे. बाबूजींची प्रतिभाही त्याच तोडीची. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणे त्यांनी दरबारी कानडात बसविले होते; मात्र त्याला दु:खी छटा येत असल्यामुळे त्यांना ती चाल आवडली नव्हती. गाणे रेकॉर्डिंग होणार होते, तरीही अंतरे केवळ डोक्यात ठेवून त्यांनी गाणे रेकॉर्ड केले. असा अलौकिक संगीतकार आणि गायक पाहिला नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)४ वसंत बहार रागातील ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’ हे गीत बसविण्यासाठी बाबूजींकडे गेलो होतो. तिथे पेटीवर या गीताचा कागद ठेवला होता. त्या गीताचे शब्द वाचल्यानंतर डोक्यात एकदम चाल घोळायला लागली. काही सुचतंय का? असे बाबूजींनी विचारले. त्यांना अस्थाई ऐकवली, खूप छान आहे असा हिरवा कंदील त्यांनी दिला आणि ‘अस्थाई’ माझी झाली, हे सांगताना जोग यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव नकळतपणे उमटले.