शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला, अक्षता पडल्या आणि काही वेळातच तिची प्राणज्योत मावळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 22:09 IST

जिवाला चटका लावून जाणारी एक घटना जिवाला चटका लावून जाणारी एक घटना

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील म्हसे येथे जिवाला चटका लावून जाणारी एक घटना घडली. डोक्यावर अक्षता पडल्या, लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत त्या जोडप्याने एकमेकांना मिठाईचे घास भरवत सर्व जण आनंदाने परतीला निघाले... दरम्यान, वधूला मंडपातच त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र सुखी संसाराचा अर्ध्यावरच डाव मोडला. उपचारापूर्वीच तिचे निधन झाले. जयश्री हिरामण मुसळे (वय १९) असे या नवविवाहितेचे नाव आहे. वधू-वरांच्या कुटुंबासह नातेवाईकावर दु:खाचे संकट कोसळले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी : शिरूर तालुक्यातील म्हसे येथील सोसायटीचे माजी चेअरमन बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामण व दिगंबर या दोन मुलांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सख्ख्या मावसबहिणी असलेल्या जयश्री शिवनिगप्पा कळसगोंडा व विजय लक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी यांच्याबरोबर ठरला होता. रविवारी थाटामाटात म्हसे येथे दुपारी बारा वाजता विवाह सोहळा उत्साहात झाला. जयश्री हिचा विवाह हिरामण यांच्यासोबत झाला. लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत, या जोडप्याने एकमेकांना मिठाईचे घासही भरवले. अक्कलकोटवरून आलेल्या आई-वडील व पाहुणे आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले. त्यानंतर अचानक जयश्रीला ताप, चक्कर येऊन त्रास होऊ लागला. सासरे बबन मुसळे व ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरूरला दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र जयश्रीची प्राणज्योत त्यापूर्वीच मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया जयश्रीच्या देवाघरी जाण्याने हिरामणचे स्वप्नही संपले.