शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला, अक्षता पडल्या आणि काही वेळातच तिची प्राणज्योत मावळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 22:09 IST

जिवाला चटका लावून जाणारी एक घटना जिवाला चटका लावून जाणारी एक घटना

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील म्हसे येथे जिवाला चटका लावून जाणारी एक घटना घडली. डोक्यावर अक्षता पडल्या, लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत त्या जोडप्याने एकमेकांना मिठाईचे घास भरवत सर्व जण आनंदाने परतीला निघाले... दरम्यान, वधूला मंडपातच त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र सुखी संसाराचा अर्ध्यावरच डाव मोडला. उपचारापूर्वीच तिचे निधन झाले. जयश्री हिरामण मुसळे (वय १९) असे या नवविवाहितेचे नाव आहे. वधू-वरांच्या कुटुंबासह नातेवाईकावर दु:खाचे संकट कोसळले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी : शिरूर तालुक्यातील म्हसे येथील सोसायटीचे माजी चेअरमन बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामण व दिगंबर या दोन मुलांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सख्ख्या मावसबहिणी असलेल्या जयश्री शिवनिगप्पा कळसगोंडा व विजय लक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी यांच्याबरोबर ठरला होता. रविवारी थाटामाटात म्हसे येथे दुपारी बारा वाजता विवाह सोहळा उत्साहात झाला. जयश्री हिचा विवाह हिरामण यांच्यासोबत झाला. लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत, या जोडप्याने एकमेकांना मिठाईचे घासही भरवले. अक्कलकोटवरून आलेल्या आई-वडील व पाहुणे आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले. त्यानंतर अचानक जयश्रीला ताप, चक्कर येऊन त्रास होऊ लागला. सासरे बबन मुसळे व ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरूरला दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र जयश्रीची प्राणज्योत त्यापूर्वीच मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया जयश्रीच्या देवाघरी जाण्याने हिरामणचे स्वप्नही संपले.