शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शंभरी पार करणाऱ्या शिवाजी पूलाचा ‘हॅपी बर्थ डे’; ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची घेतली शपथ

By श्रीकिशन काळे | Updated: September 16, 2023 17:20 IST

भारताच्या अभिमानास्पद ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करीत आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत, भगवे झेंडे फडकवित आणि १०० रंगीत फुगे हवेत सोडत छत्रपती शिवाजी पूलाचा १०० वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला...

पुणे : भारत माझा देश आहे. माझ्या देशाला विविध कलांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. याचा मला अभिमान वाटतो. या मौल्यवान परंपरेचे जतन करणे आणि संवर्धन करणे माझे कर्तव्य आहे. भारताच्या अभिमानास्पद ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करीत आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत, भगवे झेंडे फडकवित आणि १०० रंगीत फुगे हवेत सोडत छत्रपती शिवाजी पूलाचा १०० वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

ज्या पुलाने पुणेकरांची तब्बल १०० वर्षे सेवा केली त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. इतिहास प्रेमी मंडळातर्फे छत्रपती शिवाजी पूलावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतराव केंजळे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. श्री शिवाजी प्रिपेअेटरी मिल्ट्री स्कूलच्या शंभर शालेय विद्यार्थ्यानी ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याची सामूहिक शपथ यावेळी घेतली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे, केंजळे यांचे वारसदार विनित केंजळे आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

पूर्वी लॉइड ब्रिज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पूलाचे खरे नाव शिवाजी पूल असे आहे. काहीजण नवा पूल म्हणतात, छत्रपती किंवा काॅर्पोरेशन पूल असेही म्हटले जाते.

मराठी माणसाचे योगदान-

शिवाजी पूल ब्रिटिशांनी बांधला असला तरी, त्याच्या बांधकामात एका मराठी व्यक्तीचे योगदान खूप मोठे होते. रावबहादुर गणपतराव महादेव केंजळे यांच्या देखरेखीखाली या पुलाचे बांधकाम झाले. केंजळे हे निरक्षर होते, पण स्थापत्य कलेतील त्यांचे ज्ञान अभियंत्यापेक्षाही मोठे होते. रावबहादुर गणपतराव महादेव केंजळे यांनाही यावेळी अभिवादन करण्यात आले.

मोहन शेटे म्हणाले, सन १९२० पूर्वी मुठा नदी ओलांडण्यासाठी पुण्यात फक्त दोन पुल होते. याच काळात भांबुर्डा गावठाणात वस्ती वाढत होती. म्हणून त्या वेळच्या ब्रिटिश शासनाने शनिवारवाड्यासमोर नवीन पूल बांधण्याचे ठरवले, १९२० च्या जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरू होऊन १७ सप्टेंबर १९२३ रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन झाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड