शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मूठभर धान्याने ढेबे आजींना जगण्याचे बळ!

By admin | Updated: October 12, 2015 01:29 IST

‘‘आपलं या जगात कुणीच नाय. दिस कसाबसा ढकलत हाय. पर गुरुजी, तुमच्या मूठ मूठ दाण्यांनी मलाबी जगण्याची आशा दावलीया..

भोर : ‘‘आपलं या जगात कुणीच नाय. दिस कसाबसा ढकलत हाय. पर गुरुजी, तुमच्या मूठ मूठ दाण्यांनी मलाबी जगण्याची आशा दावलीया... जवळची कोणबी इचारत नसलं म्हणून काय झालं, आज माझी काळजी घेणारं चांगलं पाच-पंचवीस नातू मिळाल्यात. लय आनंद झालाय...’’ अशी डोळ्यांत अश्रू आणणारी प्रतिक्रिया दिली ती ढेबे आजींनी.तालुक्याच्या हिरडस मावळ खोऱ्यातील दुर्गम डोंगरी भागात वसलेल्या निवंगण गावात धनगर समाजाच्या या आजी हलाखीचं जीवन जगत आहेत. भागाबाई धोंडीबा ढेबे असे त्यांचे नाव.दिवसभरात भोर आगाराच्या अनियमित धावणाऱ्या दोन बस वगळता, शहरासाठी या गावाचा फारसा संपर्क येत नाही. भातशेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आर्थिक परवड येथील लोकांच्या पाचवीलाच पुजलेली. गावात नुकतीच भोर एज्युकेशन संस्थेने शाळा सुरू केली आहे. समीर सहस्रबुद्धे हे शिक्षक येथे नवीनच रुजू झाले आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरलेल्या सत्तरी पार केलेल्या या आजीबाई ८ ते ९ वर्षांच्या चिमुकल्याबरोबर दिसत. समीर यांनी शाळेतील मुलांकडे चौकशी केली असता, त्यांच्या हलाखीचा परिचय झाला. ढेबे आजी त्यांच्या चिमुकल्या नातूबरोबर येथे जीवन कसंबसं जगत आहेत. पोटच्या मुलाचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. सूनही सोडून गेली. आणि दोन वर्र्षांच्या नातवाला सांभाळण्याची जबाबदारी ढेबे आजींवर आली. हे समजल्यानंतर समीर यांनी प्रत्येक मुलाला दर शनिवारी मूठभर तांदूळ आणण्यास सांगितले. चार आठवड्यांनंतर जमा झालेले ९ ते १० किलो तांदूळ ढेबेआजींना शाळेत बोलावून एका छोट्याशा कार्यक्रमात स्वाधीन केले. त्या वेळी आजींनी त्यांच्या जीवनाची ही चित्तरकथा ऐकवली आणि सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आलं. या वेळी संस्थेचे सचिव समीर वाकणकर, सुनील देशपांडे, प्रा. विक्रम शिंदे, शिक्षक गणेश पांगुळ, सरपंच किसन दिघे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)