शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

चुलत मामानेच केले भाच्याचे अपहरण, पंधरा जणांनी केली बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:45 PM

वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वाटपाचा राग मनात धरून अपहरण करण्यात आलेल्या चोवीसवर्षीय तरुणाला डांबून ठेवत व हातपाय दोरीने बांधून पंधरा जणांच्या टोळक्याने त्याला हात व लाथा-बुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केल्याचा प्रकार खेड तालुक्याच्या धामणगाव येथे घडला.

चाकण : वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वाटपाचा राग मनात धरून अपहरण करण्यात आलेल्या चोवीस वर्षीय तरुणाला डांबून ठेवत व हातपाय दोरीने बांधून पंधरा जणांच्या टोळक्याने त्याला हात व लाथा-बुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केल्याचा प्रकार खेड तालुक्याच्या धामणगाव येथे घडला. याप्रकरणी पंधरा जणांच्या टोळक्याला सोमवारी (दि. १८) अटक करण्यात आली. चुलतमामानेच भाच्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.संदीप शांताराम शिंदे (वय २४, रा. आंबेठाण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिंदे यांच्या फिर्यादीवरून नीतेश नारायण कदम (रा. बेंगनवाडी), विनोदकुमार रामगोपाल भारती (रा. बेंगनवाडी), नितीन अशोक मोरे (बेंगनवाडी), विकास हरिश्चंद्र गमरे (रा. बेंगनवाडी), यज्ञेश घनश्याम पाटील(रा. पालघर), तुषार जितेंद्र अमडसकर (रा. पालघर), अतिश सद्गुण (रा. नवी मुंबई), सुरेश दुर्गेश शेटे (रा. मुंबई), आरूप आस्टो मन्ना (रा. पालघर), गणेश पांडुरंग गागी (रा. पालघर), विकास अशोक जाधव (रा. पालघर), हरी बच्चुलाल दुबे (रा. पालघर), सुनील अनंत केदारी (रा. मुंबई), विशाल भगवान भालेराव (रा. मुंबई), जगन्नाथ धोंडिबा घोडके (रा. पालघर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संदीप शिंदे यांची नायफड (ता. खेड) येथे वडिलोपार्जित वीस ते बावीस एकर जमीन आहे. शिंदे यांचे मृत चुलते भागुजी शिंदे यांची पत्नी नानुबाई व माझे वडील शांताराम शिंदे यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून जमीनवाटपाचा वाद सुरू आहे. याच कारणावरून सन २०१५ मध्ये धामणगाव येथे माझ्या मित्राचे लग्न असताना, मी व माझ्यासोबत असणारे दोन मित्र मिळून लग्नाला गेलो होतो. त्या वेळी लग्नात माझी चुलती नानुबाई हिचा भाऊ जगन्नाथ घोडकेदेखील (रा. मुंबई) आले होते. त्या वेळी त्यांनी मला माझ्या वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वाटपाचा राग मनात धरून, शिवीगाळ, दमदाटी करून थोबाडीत मारली, म्हणून मीदेखील त्यांच्या थोबाडीत मारली होती, तेव्हापासून घोडके माझ्यावर चिडून होता. सोमवारी (दि. १८) सकाळी सहा वाजण्याच्यादरम्यान मी आंबेठाण येथे असताना, वरील पंधरा जणांचे टोळके माझ्या घरी आले. त्यातील पाच-सहा जणांनी शिवीगाळ करून, माझ्या तोंडाला रूमाल बांधून घरातून बाहेर उचलून आणले, त्या वेळी घरात घाबरलेली माझी पत्नी अर्चना व वडील शांताराम यांनाही त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. सोबत आणलेल्या तवेरा गाडीमधून त्यांनी माझे अपहरण केले. संबंधित गाडीतून त्यांनी मला चासकमान धरणावर नेऊन, गाडीतून बाहेर ओढून काढले, दहा ते बारा जणांनी जबरदस्तीने धरणाच्या भिंतीवरून खाली ढकलून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मी गयावया केली असता, त्यांनी मला परत गाडीत बसवून धामणगाव येथे आणले व जगन्नाथ घोडके व त्याच्या साथीदारांनी मला खाली पाडून हात व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील काही जणांनी माझे हातपाय दोरीने बांधून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर संबंधित टोळके वाडा येथे नाष्टा करण्यासाठी जाण्यापूर्वी आम्ही तेथून आल्यानंतर आम्ही तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड टाकून तुला धरणात फेकून देणार आहोत, असे बजावून ते निघून गेले. त्यानंतर मी तेथे डांबून ठेवलेल्या एका घरातून तोंडाला व हातापायाला बांधलेली दोरी सोडून, घरातील माळ्यावरून उडी मारून रस्त्यावर आलो, त्यानंतर मला रस्त्यावर भेटलेल्या पोलिसांनी वाडा येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.याबाबतीची माहिती मिळताच संदीप शिंदे यांच्या नातेवाइकांनी दोन तवेरा गाड्यांचा पाठलाग करून, त्यातील पंधरा जणांना पकडून संबंधित वाहनांची तोडफोड करून, पंधरा जणांच्या टोळक्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्या सर्वांना रात्री उशिरा अटक केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार व त्यांचे अन्य सहकारी करीत आहेत.