शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

निम्म्या शिक्षण संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत - सत्यपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:57 IST

भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.

पुणे : भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.एमआयटीच्या वतीने आयोजित दुसºया नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. या वेळी एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक राजीव सेठी, अलका सिंग, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. सिंग म्हणाले, ‘डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार यांसारखी समाजाचे आरोग्य सांभाळणारी माणसे आजकाल आत्महत्या करत आहेत, गुन्हे करत आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवते. सृजनशीलता, संशोधन आणि आध्यात्म यांच्या संगमातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडू शकतो. मेकॉलेने आदर्श भारतीय शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली व गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था आणली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपण त्याला सावरू शकलेलो नाही.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘अनेक देश वैदिक शिक्षणाकडे वळत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’उच्च शिक्षित विद्यार्थी शिपाई पदासाठी!शिपाई पदासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करीत आहेत, ही बाब चिंतेची आहे. आंतरशाखीय शिक्षणाचा उपयोग करून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. तशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत, असे मत राजीव सेठी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे