शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मांजरेवाडी परिसरात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:02 IST

पिकांचे नुकसान : प्रतिकार करताच शेतकऱ्यांवरच करतात हल्ला

दावडी : खेड तालुक्यातील मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथे रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकºयांनी लावलेले कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. या परिसरात रोज रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही वनविभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मांजरेवाडी येथील एक शेतकरी भगवान मांजरे यांच्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालून संपूर्ण कांदापिकाचे नुकसान केले आहे.

जवळपास दोन एकर शेतातील कांदापिकाचे नुकसान झाले आहे. मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी डोंगरालगत आहेत. या परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांच्या टोळ्या या परिसरात फिरत आहेत.शेतकऱ्यांनी घेतलेले कांदापिक, बटाटा, तसेच मकापिकाची कणसे रानडुकरे खाऊन नुकसान करीत आहेत. तसेच कधी भारनियमन असल्यास शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना द्यावे लागते. या रानडुकरांच्या टोळीच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीचे पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. तसेच शेतकºयांनी प्रतिकार केला असता, ही रानडुकरे शेतकºयांच्याच अंगावर धावून येत आहेत. रानडुकरांच्या सततच्या त्रासामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.पिकांचे नुकसानखेड तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हेच प्रमुख पीक असताना कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पिकाची नासाडी केली आहे.वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपण करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वनविभाग शेतकºयाच्याच मानगुटीवर बसतो.४शेतकºयांच्या तोंडचा घास काढून न घेता शासनाने वन्यप्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी