शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

मांजरेवाडी परिसरात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:02 IST

पिकांचे नुकसान : प्रतिकार करताच शेतकऱ्यांवरच करतात हल्ला

दावडी : खेड तालुक्यातील मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथे रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकºयांनी लावलेले कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. या परिसरात रोज रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही वनविभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मांजरेवाडी येथील एक शेतकरी भगवान मांजरे यांच्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालून संपूर्ण कांदापिकाचे नुकसान केले आहे.

जवळपास दोन एकर शेतातील कांदापिकाचे नुकसान झाले आहे. मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी डोंगरालगत आहेत. या परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांच्या टोळ्या या परिसरात फिरत आहेत.शेतकऱ्यांनी घेतलेले कांदापिक, बटाटा, तसेच मकापिकाची कणसे रानडुकरे खाऊन नुकसान करीत आहेत. तसेच कधी भारनियमन असल्यास शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना द्यावे लागते. या रानडुकरांच्या टोळीच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीचे पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. तसेच शेतकºयांनी प्रतिकार केला असता, ही रानडुकरे शेतकºयांच्याच अंगावर धावून येत आहेत. रानडुकरांच्या सततच्या त्रासामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.पिकांचे नुकसानखेड तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हेच प्रमुख पीक असताना कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पिकाची नासाडी केली आहे.वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपण करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वनविभाग शेतकºयाच्याच मानगुटीवर बसतो.४शेतकºयांच्या तोंडचा घास काढून न घेता शासनाने वन्यप्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी