शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

‘एनएच ९६५’चे बाधित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:37 IST

उपोषणाचा पाचवा दिवस; काही शेतकऱ्यांना जमिनींचे अधिग्रहण केल्याची माहितीच नाही; प्रांताधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप

इंदापूर : इंदापूर तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या कामाला सुरुवात झाली असून, शासनाने काही इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून भूमी अधिग्रहण केल्याचे राजपत्र जाहीर केले. परंतु राजपत्रात ज्या शेतकºयांची नावे आहेत, त्यांतील काही शेतकºयांना अजूनपर्यंत शासनाची कोणतीही नोटीस आलेली नाही. शासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संपूर्ण माहिती मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती कृती समितीचे सल्लागार अ‍ॅड. राहुल मखरे यांनी दिली. शुक्रवारी संपाचा पाचवा दिवस होता.राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी शासनाच्यावतीने ताब्यात घेण्यास जलदगतीने हालचाली सुरू आहेत. ज्या जागेतून महामार्ग जाणर आहे, त्यातील गायरान जागेत राहणाºया कुटुंबांना काय मोबदला मिळणार? असा सवाल गायरानातील शेकडो कुटुंबे शासनाला विचारत आहेत. शेतकºयांना विश्वासात न घेता, अधिग्रहण चालू असल्याचा आरोप कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यावर करण्यात आला आहे.भूमिअधिग्रहण करण्यासंदर्भात बाधित शेतकरी समितीकडून १ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहिती मागण्यात आली होती. ती उपलब्ध झाली नसल्याने शेतकºयांनी १० सप्टेंबर रोजी साखळी उपोषणाला सुरुवात केली असून, शुक्रवारी या संपाचा पाचवा दिवस होता. शेतकºयांच्या समस्यांची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून त्यांना कधी न्याय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.साखळी उपोषणाच्या ठिकाणाला प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट देऊन बाधित शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. बाधित नसणारेच लोक आंदोलन करीत आहेत, असे दिशाभूल करणारे वाक्य ते बोलताच गायरान बाधित लोक आक्रमक झाले. यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते. यावेळी राजेंद्र कुरुळे, अशोक भोसले, नेताजी लोंढे, मंगेश घाडगे, महेश लोंढे, केशव सुर्वे, महेश भाळे, प्रकाश चौगुले आदी गायरान बाधित शेतकरी उपस्थित होते.बारामती उपविभागीय प्रांताधिकारी शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपबारामती उपविभागीय प्रांताधिकारी हेमंत निकम हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या भूमिअधिग्रहणाच्या कामात कसूर करीत आहेत. बाधित शेतकºयांना विश्वासात न घेता, ज्या कंपनीला काम दिले आहे त्या कंपनीच्या बाजूने अनुकूल निर्णय ते घेत आहेत. यामुळे त्यांची बदली करून या कामासाठी सक्षम अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब भोंग, उपाध्यक्ष राहुल शिंगाडे, महासचिव संजय कांबळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्ग