शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘एनएच ९६५’चे बाधित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:37 IST

उपोषणाचा पाचवा दिवस; काही शेतकऱ्यांना जमिनींचे अधिग्रहण केल्याची माहितीच नाही; प्रांताधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप

इंदापूर : इंदापूर तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या कामाला सुरुवात झाली असून, शासनाने काही इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून भूमी अधिग्रहण केल्याचे राजपत्र जाहीर केले. परंतु राजपत्रात ज्या शेतकºयांची नावे आहेत, त्यांतील काही शेतकºयांना अजूनपर्यंत शासनाची कोणतीही नोटीस आलेली नाही. शासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संपूर्ण माहिती मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती कृती समितीचे सल्लागार अ‍ॅड. राहुल मखरे यांनी दिली. शुक्रवारी संपाचा पाचवा दिवस होता.राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी शासनाच्यावतीने ताब्यात घेण्यास जलदगतीने हालचाली सुरू आहेत. ज्या जागेतून महामार्ग जाणर आहे, त्यातील गायरान जागेत राहणाºया कुटुंबांना काय मोबदला मिळणार? असा सवाल गायरानातील शेकडो कुटुंबे शासनाला विचारत आहेत. शेतकºयांना विश्वासात न घेता, अधिग्रहण चालू असल्याचा आरोप कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यावर करण्यात आला आहे.भूमिअधिग्रहण करण्यासंदर्भात बाधित शेतकरी समितीकडून १ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहिती मागण्यात आली होती. ती उपलब्ध झाली नसल्याने शेतकºयांनी १० सप्टेंबर रोजी साखळी उपोषणाला सुरुवात केली असून, शुक्रवारी या संपाचा पाचवा दिवस होता. शेतकºयांच्या समस्यांची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून त्यांना कधी न्याय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.साखळी उपोषणाच्या ठिकाणाला प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट देऊन बाधित शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. बाधित नसणारेच लोक आंदोलन करीत आहेत, असे दिशाभूल करणारे वाक्य ते बोलताच गायरान बाधित लोक आक्रमक झाले. यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते. यावेळी राजेंद्र कुरुळे, अशोक भोसले, नेताजी लोंढे, मंगेश घाडगे, महेश लोंढे, केशव सुर्वे, महेश भाळे, प्रकाश चौगुले आदी गायरान बाधित शेतकरी उपस्थित होते.बारामती उपविभागीय प्रांताधिकारी शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपबारामती उपविभागीय प्रांताधिकारी हेमंत निकम हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या भूमिअधिग्रहणाच्या कामात कसूर करीत आहेत. बाधित शेतकºयांना विश्वासात न घेता, ज्या कंपनीला काम दिले आहे त्या कंपनीच्या बाजूने अनुकूल निर्णय ते घेत आहेत. यामुळे त्यांची बदली करून या कामासाठी सक्षम अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब भोंग, उपाध्यक्ष राहुल शिंगाडे, महासचिव संजय कांबळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्ग