शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:01 IST

जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला

वाघापूर : पुरंदरमधील शेतकरी वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीच्या जिवावर आपली उपजीविका करीत आहे. असे असताना शासनाने त्यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु, त्या देण्याऐवजी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने हिसकावून घेतल्या जात आहेत. जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा देतानाच शासन स्थानिक भूमिपुत्रांचे थडगे बांधून त्यावर विकासाचे मनोरे कुणासाठी उभारत आहे? असा जळजळीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.सासवड (ता. पुरंदर) येथे एका कार्यक्रमासाठी सोमवारी आले होते. या वेळी त्यांनी शासनावर कठोर शब्दांत प्रहार केला. या प्रसंगी माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ नेते विजय कोलते, भाजपच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर, जि.प.च्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बादल, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे आदी उपस्थित होते.शेट्टी यांनी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा खमक्या असावा लागतो, असा टोला राज्यमंत्री विजय शिवतारे यांना लगावला.राजकारणातील गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी अशी गटारे बंद करा आणि स्वच्छ चारित्र्याची निवडून द्या, त्यानंतरच सुप्रशासन येईल व जनतेला न्याय मिळेल. त्यासाठी जनतेने अशी माणसे शोधावीत, असे आवाहन केले.विमानतळामुळे उद्योजकांचा विकास होणार असला, तरी स्थानिकांना त्याचा काहीच फायदा नाही. मग शासन हे विमानतळ कुणासाठी लादत आहे? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAirportविमानतळPuneपुणे