शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:01 IST

जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला

वाघापूर : पुरंदरमधील शेतकरी वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीच्या जिवावर आपली उपजीविका करीत आहे. असे असताना शासनाने त्यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु, त्या देण्याऐवजी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने हिसकावून घेतल्या जात आहेत. जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा देतानाच शासन स्थानिक भूमिपुत्रांचे थडगे बांधून त्यावर विकासाचे मनोरे कुणासाठी उभारत आहे? असा जळजळीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.सासवड (ता. पुरंदर) येथे एका कार्यक्रमासाठी सोमवारी आले होते. या वेळी त्यांनी शासनावर कठोर शब्दांत प्रहार केला. या प्रसंगी माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ नेते विजय कोलते, भाजपच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर, जि.प.च्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बादल, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे आदी उपस्थित होते.शेट्टी यांनी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा खमक्या असावा लागतो, असा टोला राज्यमंत्री विजय शिवतारे यांना लगावला.राजकारणातील गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी अशी गटारे बंद करा आणि स्वच्छ चारित्र्याची निवडून द्या, त्यानंतरच सुप्रशासन येईल व जनतेला न्याय मिळेल. त्यासाठी जनतेने अशी माणसे शोधावीत, असे आवाहन केले.विमानतळामुळे उद्योजकांचा विकास होणार असला, तरी स्थानिकांना त्याचा काहीच फायदा नाही. मग शासन हे विमानतळ कुणासाठी लादत आहे? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAirportविमानतळPuneपुणे