शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:01 IST

जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला

वाघापूर : पुरंदरमधील शेतकरी वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीच्या जिवावर आपली उपजीविका करीत आहे. असे असताना शासनाने त्यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु, त्या देण्याऐवजी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने हिसकावून घेतल्या जात आहेत. जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा देतानाच शासन स्थानिक भूमिपुत्रांचे थडगे बांधून त्यावर विकासाचे मनोरे कुणासाठी उभारत आहे? असा जळजळीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.सासवड (ता. पुरंदर) येथे एका कार्यक्रमासाठी सोमवारी आले होते. या वेळी त्यांनी शासनावर कठोर शब्दांत प्रहार केला. या प्रसंगी माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ नेते विजय कोलते, भाजपच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर, जि.प.च्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बादल, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे आदी उपस्थित होते.शेट्टी यांनी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा खमक्या असावा लागतो, असा टोला राज्यमंत्री विजय शिवतारे यांना लगावला.राजकारणातील गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी अशी गटारे बंद करा आणि स्वच्छ चारित्र्याची निवडून द्या, त्यानंतरच सुप्रशासन येईल व जनतेला न्याय मिळेल. त्यासाठी जनतेने अशी माणसे शोधावीत, असे आवाहन केले.विमानतळामुळे उद्योजकांचा विकास होणार असला, तरी स्थानिकांना त्याचा काहीच फायदा नाही. मग शासन हे विमानतळ कुणासाठी लादत आहे? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAirportविमानतळPuneपुणे