शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

संमेलनाला गुजरातने मदत करावी; भारत देसडला यांची मागणी; नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:28 IST

घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता. 

ठळक मुद्देगुजरात सरकारने पुढाकार घेतल्यास संमेलनाच्या परंपरेत नवा इतिहास : राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या ९१ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष

पुणे : घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता. हीच परंपरा पुढे नेत गुजरात सरकारने बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनाला राज्य सरकारचे अधिकृत संमेलन म्हणून सर्वतोपरी मदत करावी, अशा आशयाचे पत्र ८८ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांनाही पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सरहद संस्थेतर्फे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला पंजाब सरकारने मदतीचा हात दिला होता.  या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने बडोद्यातील संमेलनाला मदत करावी, अशी विनंती देसडला यांनी मोदी यांना केली आहे. बडोद्याला १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सयाजीराव गायकवाड यांच्या भूमीत संमेलन होत आहे. गुजरात ही आपली कर्मभूमी असल्याने या माध्यमातून सरकारने संमेलनाला अधिकृत दर्जा देऊन मदत केल्यास गुजरात आणि महाराष्ट्रातील सबंध अधिक दृढ होतील.सयाजीराव गायकवाड यांच्या घराण्यातील राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या ९१ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे या संमेलनाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी गुजरात सरकारने पुढाकार घेतल्यास संमेलनाच्या परंपरेत नवा इतिहास घडू शकेल आणि घुमानप्रमाणे हे संमेलनही यशस्वी होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

साहित्यिक कलावंत संमेलनातही मागणीसाहित्यिक कलावंत संमेलनात संजय नहार यांनीही या मुद्दा अधोरेखित केला होता. ते म्हणाले, 'बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी गुजरात सरकारने देखील उदारमतवादी धोरण ठेवले पाहिजे. महाराष्ट्राने पंजाबला नामदेव दिले, त्याचप्रमाणे मराठीभूमीने गुजरातला सयाजीराव गायकवाड दिले आहेत. कला आणि साहित्याविषयी महाराजा सयाजीराव गायकवाडांना खूप आस्था होती. पंतप्रधानदेखील गुजरातचेच असल्यामुळे आगामी संमेलनाविषयी मराठी बांधवांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.'

टॅग्स :Sanjay Naharसंजय नहारliteratureसाहित्यPuneपुणे