शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री-महापौर वाद पुन्हा पेटला

By admin | Updated: October 28, 2016 04:43 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय महापालिकांना उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करता येऊ नयेत; तसे झाल्यास संबंधितांकडून खर्च वसूल करावा, असे पत्र

पुणे : जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय महापालिकांना उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करता येऊ नयेत; तसे झाल्यास संबंधितांकडून खर्च वसूल करावा, असे पत्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना पाठविले. यावरून पालकमंत्री व महापौर प्रशांत जगताप यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. पालकमंत्री खुनशी राजकारण करून महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.सीओईपी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला महापालिकेच्या वतीने गिरीश बापट यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडे वेळ नसल्याने ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. वेळ उपलब्ध नसताना उद्घाटनाचा कार्यक्रम घेतल्यामुळे बापट नाराज झाले. त्यांनी नगरविकास विभागच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना याबाबत पत्र पाठविले आहे. शासनाच्या २७ जुलै २०१५च्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्यांना आमंत्रित केल्याशिवाय स्थानिक प्राधिकरणामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यास अशा कार्यक्रमांवर होणारा खर्च संयोजकांकडून वसूल करण्यात यावा. त्यामुळे अशा कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देऊ नये, अशा सक्त सूचना आयुक्तांना द्याव्यात, असे बापट यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला पाठविलेल्या या पत्रावर प्रशांत जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जगताप म्हणाले, ‘‘कार्यक्रमाला कोणाला बोलवावे, याचे संपूर्ण अधिकार महापौरांना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्घाटनाचा धडाका लावला आहे. पालकमंत्री गेली दोन वर्षे सत्तेवर असतानाही शहरासाठी त्यांना एकही नवीन प्रकल्प आणता आलेला नाही. त्यामुळे त्यांनी भीतीतून नगरविकास विभागाला पत्र पाठविले आहे. ते राजकीय आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौरांचे नाव न टाकणे, शहराला एक दिवसाआड पाणी सोडणे अशा अनेक विषयांवर पालकमंत्री व महापौरांमध्ये सातत्याने वादाची ठिणगी पडत आहे. (प्रतिनिधी)निमंत्रण पत्रिकेत सर्व आमदारांची नावे महापालिकेच्या उद्घाटन व इतर कार्यक्रमांसाठी काढल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत केवळ पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव टाकणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे महापालिकेकडून शहरातील सर्व खासदार तसेच विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकली जातात.प्रोटोकॉल पाळत नाहीत म्हणून लिहिलं पत्रमहापालिकेच्या कार्यक्रमात पालकमंत्री व मंत्री यांना बोलावणे हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. महापालिकेकडून तो पाळला जात नाही. त्यामुळेच नगरविकास विभागाला मी पत्र लिहिले आहे. यामागील कोणत्या कार्यक्रमात त्यांनी हा बेजबाबदारपणा केला आहे त्याचीही माहिती मागविणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पाणी साठवण टाक्यांच्या कार्यक्रमाची पालिकेच्या माध्यमातून जाहिरात केली. त्यावर फक्त त्यांचे नेते अजित पवार यांचेच छायाचित्र होते. भाजपाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर ही पक्षाची जाहिरात होती व तिचे पैसे आम्ही भरणार, अशी भलामण केली. अजित पवार यांची तारीख व वेळ मिळाल्यावर ते पालकमंत्री म्हणून मला निमंत्रण देतात. मात्र, काही सांगायचेच नाही, बोलवायचेच नाही हा राजशिष्टाचाराचा भंग आहे व तो त्यांनी अनेकजा केला. यापूर्वीच्या जाहिरातींची माहिती मागवणार आहे, असे बापट म्हणाले.नगरसचिवांना मुंबईला बोलावले : पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला पाठविलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर नगरसचिव सुनील पारखी व महापौरांच्या प्रोटोकॉल आॅफिसर योगिता भोसले यांना शुक्रवारी मुंबईला बोलावण्यात आले आहे. महापालिकेच्या कार्यक्रमांसंबंधी त्यांना विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.