शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जिल्हा परिषदेवर हक्कभंग आणणार, पालकमंत्री गिरीश बापटांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:01 IST

जिल्ह्याचा पालकमंत्री असून देखील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांना मला न बोलावता राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे.

पुणे : जिल्ह्याचा पालकमंत्री असून देखील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांना मला न बोलावता राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे. यामुळे संतापलेले जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी थेट जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यावर हक्कभंग आणणार असल्याचे येथे सांगितले. यासाठी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर बंगला येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी ही माहिती दिली.पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास बापट यांना बोलावण्यात आले नाही. शिवाय, कार्यक्रम पत्रिकेत नावही टाकण्यात आले नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले,राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री या नात्याने मला जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना बोलावणे आणि निमंत्रण पत्रिकेत नाव टाकणे बंधनकारण आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना मला न बोलावता डावलले जात आहे. ही बाब माझ्या लक्षात येत होती, पण याकडे दुर्लक्ष केले होते. आधीच्या पालकमंत्र्यांच्या काळात जिल्हा परिषदेकडून राजशिष्टाचार पाळला जात होता, मग आता का पाळला जात नाही ? असा सवा उपस्थित करत बापट यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिका-यांवर आणि व पदाधिका-यावर कारवाई करण्यासांठी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट