शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

जिल्हा परिषदेवर हक्कभंग आणणार, पालकमंत्री गिरीश बापटांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:01 IST

जिल्ह्याचा पालकमंत्री असून देखील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांना मला न बोलावता राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे.

पुणे : जिल्ह्याचा पालकमंत्री असून देखील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांना मला न बोलावता राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे. यामुळे संतापलेले जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी थेट जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यावर हक्कभंग आणणार असल्याचे येथे सांगितले. यासाठी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर बंगला येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी ही माहिती दिली.पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास बापट यांना बोलावण्यात आले नाही. शिवाय, कार्यक्रम पत्रिकेत नावही टाकण्यात आले नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले,राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री या नात्याने मला जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना बोलावणे आणि निमंत्रण पत्रिकेत नाव टाकणे बंधनकारण आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना मला न बोलावता डावलले जात आहे. ही बाब माझ्या लक्षात येत होती, पण याकडे दुर्लक्ष केले होते. आधीच्या पालकमंत्र्यांच्या काळात जिल्हा परिषदेकडून राजशिष्टाचार पाळला जात होता, मग आता का पाळला जात नाही ? असा सवा उपस्थित करत बापट यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिका-यांवर आणि व पदाधिका-यावर कारवाई करण्यासांठी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट