शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 03:43 IST

आजपासून प्रारंभ : संगीतप्रेमींच्या कसोटीवर उतरणार का?

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात भारतीय अभिजात संगीतविश्वात मानाचे स्थान मिळविलेल्या दिग्गज कलावंतांपेक्षा नवोदित कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नव्या जागेत सवाईचे सूर प्रस्थापित करण्याचे मोठे शिवधनुष्य या नवोदितांना पेलावे लागणार आहे. या कसोटीवर ते पूर्णपणे उतरणार का? याकडे संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे.अनेक वर्षांपासून पेठेच्या संस्कृतीमध्ये रूळलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षीपासून मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलच्या जागेत स्थलांतरित झाला आहे. देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या (बुधवार) पासून दिमाखात सुरुवात होत आहे. या पेठेबाहेरच्या पुण्यात पुन्हा नव्याने महोत्सव स्थिरस्थावर करणे हेच आता आयोजकांपुढचे मोठे आव्हान आहे. महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे. दर वर्षी एक वर्षाआड महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक एन. राजम यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील विविध कलावंतांची महोत्सवात हमखास वर्णी लावली जाते. पण यंदा यातील एकही कलाकार महोत्सवात दिसणार नाही.आयोजकांनी पं. बिरजू महाराज, उस्ताद शाहीद परवेज, पं. उल्हास कशाळकर, बेगम परवीन सुलताना अशा काही मान्यवर कलावंताना सोडले तर यंदा १३ नवोदित कलाकारांना महोत्सवात संधी दिली आहे. गतवर्षी महोत्सवात ९ नवोदित कलाकार होते. यंदा ही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नव्या जागेत महोत्सव स्थिरस्थावर करण्याची भिस्त याच नवोदितांवर आहे. सवाईमध्ये आपली कला सादर करण्याचे प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. यंदाच्या वर्षी नवोदितांसाठी ही कसोटी ठरणार आहे. मात्र ज्येष्ठ रसिकमंडळींनी महोत्सवात नवोदितांपेक्षाही दिग्गज कलावंतांच्या सादरीकरणाला काहीसे झुकते माप दिले आहे.महोत्सवातील आजचे कार्यक्रम(दुपारी ३ ते रात्री १०)कल्याण अपार, औरंगाबाद (सनई)रवींद्र परचुरे (गायन)वसंत काब्रा (सतार)प्रसाद खापर्डे (गायन)परवीन सुलताना (गायन)यंदाच्या महोत्सवातील कलाकार पाहिले तर नवोदित कलाकार अधिक आहेत. जी चांगली गोष्ट आहे. नवोदितांनादेखील व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. कारण, शेवटी तेच हा सांगीतिक वारसा पुढे नेणार आहेत. मात्र आमच्यासारख्या कलावंतांना अजूनही ‘जुनं तेच सोनं’ वाटत असल्याने ज्येष्ठ कलावंतांचे अविष्कार अनुभवणे ही आमच्यासाठी सुखद पर्वणी असते.- वासुदेव कुलकर्णीइतर महोत्सवाची तिकिटे ही आमच्यासारख्या लोकांना फारशी परवडणारी नसतात त्यामुळे सवाईमध्ये जुन्या-नव्या कलाकारांना ऐकण्याची पर्वणी मिळते. मी ठाण्यावरून दर वर्षी या महोत्सवाला हजेरी लावतो. ज्येष्ठ कलावंतांना ऐकायला मिळावे, केवळ एवढीच त्यामागची इच्छा असते.- नाना चरणकरआठवण आजही मनातभविष्यात हा महोत्सव नवोदित कलाकारांमुळे ओळखला जाण्याची शक्यता आहे. ज्यात गैर काहीच नाही. पण याच आम्ही महोत्सवात पं. फिरोज दस्तूर, सरस्वतीबाई राणे, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर गायकांच्या मैफली अनुभवल्या आहेत, त्याची आठवण आजही मनात आहे.या कलावंतांना समोर बसून ऐकणे हा अनुभव काहीसा वेगळाच आहे. त्यामुळे महोत्सवात नवोदितांबरोबर दिग्गज कलावंतांचे अविष्कारही अधिकाधिक अनुभवायला मिळावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ रसिकमंडळींनी व्यक्त केली आहे.