शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

प्रशासनावर " वचक " असणाऱ्या अजितदादांच्या तालुक्यातच ग्रामसेवक ढिम्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 20:33 IST

उच्चशिक्षित डॉक्टर सरपंचांची थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ठळक मुद्देकामे न करणाऱ्या ,भ्रष्टाचारी ग्रामसेवकांना निलंबित करा

बारामती : प्रशासनावर वचक असणाऱ्या  उपमुख्यमंत्री 'अजितदादां' च्या बारामती तालुक्यातच काही ग्रामसेवक उदासीनतेने कामकाज करीत असल्याची तक्रार उच्चशिक्षित डॉक्टर असणाऱ्या  महिला सरपंचांनी केली आहे. तालुक्यातील मेडद गावच्या सरपंच डॉ उज्वला पांडुरंग गावडे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालत तक्रार आहे.कामे न करणाऱ्या , भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी डॉ गावडे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले आहे.त्यामुळे ग्रामपंचातीची विदारक अवस्थेवर चर्चा रंगली आहे. सरपंच डॉ गावडे यांनी बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.  या निवेदनानुसार, अजित पवार यांच्यासारखे कर्तबगार व प्रशासनावर वचक व जनतेची तत्परतेने कामे करणारे नेते अहोरात्र काम करतात.मात्र, बारामती तालुक्यात मात्र ग्रामपंचायतीच्या कारभाराची अवस्था भयावह व विदारक आहे.मौजे मेडद व इतर तालुक्यातील ग्रामपंचायती फक्त १ ते २ तास उघड्या असतात.वास्तविक या ग्रामपंचायती सकाळी १० ते सायं.६ वाजेपर्यंत खुल्या असणे आवश्यक आहे,ग्रामसेवक पूर्ण वेळ हजर असावेत,नियुक्तीच्या ठिकाणी त्यांनी राहावे,कामगारांवर  ग्रामसेवकांचा अंकुश हवा,ग्रामसेवकांवर गटविकास अधिकारी यांचा अंकुश हवा,ग्रामसेवकांनी तेथून दिलेली कामे तत्परतेने करावीत,जे ग्रामसेवक कामे करत नाहीत,टाळाटाळ करतात,भ्रष्टाचार करतात, वरिष्ठ कार्यालयास खोटी माहिती देवून दिशाभूल करतात त्यांना तात्काळ निलंबित करावे. कर्मचारांच्यावर ग्रामसेवक कार्यवाही करत नाहीत. ग्रामसेवकावर वरिष्ठ कार्यालय कार्यवाही करत नाही.या प्रशाशनाच्या सुस्त,ढिसाळ कारभार बदलायला हवा.नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत,  आज सध्या २१ व्या शतकातील प्रगत भारत देशात ग्रामपंचायतीत असा कारभार चालत असेल तर देशाची प्रगती कधी होणार,असा सवाल सरपंच डॉ गावडे यांनी केला आहे. —————————————————... गाव सुधारेल तर देश सुधारेलह्यगाव सुधारेल तर देश सुधारेलह्ण तरी     आपण ग्रामपंचायतिचा कारभार सुधारण्यासाठी संबंधितावर आदेश व कार्यवाही करावी. तसेच मौजे-मेडद ग्रामसेवकांची अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतर व नवीन ग्रामसेवक नियुक्त झाल्यानंतर,सरपंचाच्या संमतीने रजेवर पाठवावे,अशी मागणी सरपंच डॉ गावडे यांनी केली आहे.या बाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.शिवाय प्रत्यक्ष भेटुन तालुक्यातील वास्तव मांडणार असल्याचे मेडद च्या सरपंच डॉ पांडुरंग गावडे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना सांगितले.                    

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारgram panchayatग्राम पंचायत