शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीने ग्रामपंचायत मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कराची रक्कम अनेकांनी थकीत ठेवली होती. ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्यामुळे कार्यालयाचे भाडे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कराची रक्कम अनेकांनी थकीत ठेवली होती. ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्यामुळे कार्यालयाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, पथदिव्यांची बिले भरणे कठीण झाले होते. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागातर्फे शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २२ हजार ७६६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत १५ कोटी ७९ लाख ७९ हजार १६७ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवसांत वसुली झाल्याने ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे अनेकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली नाही. ग्रामस्थांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला पैशांची आवश्यकता असते. कामगारांचे पगार, पाईपलाईन फुटणे, पथदिव्यांचे वीजबिल भरणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. काही ग्रामस्थांना अनेक वर्षे नोटीस देऊनही ते घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याने ग्रामपंचायतींनी न्यायालयात धाव घेतली होती. थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवून शनिवारी (दि. २५) राष्ट्रीय लोकअदालत न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण जिल्ह्यात लोकअदालत न्यायालयामध्ये ही प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात जवळपास ६५ हजार १२५ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यातत आले होते. तर ४७ कोटी ६२ लाख ८२ हजार २९२ रुपयांच्या वसूलीचे उद्दीष्ट ग्रामपंचायत विभागाचे होते. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवत अनेक प्रकरणे निकाली काढले. यात प्रशासनाला १५ कोटी ७९ लाख ७९ हजार १६७ रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.

चौकट

सर्वाधिक वसुली शिरूर, खेड, मुळशी तालुक्यात

जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीत सर्वाधिक वसुली शिरुर, खेड, मुळशी तालुक्यातून झाली. शिरूर तालुक्यातून ५ कोटी ११ लाख ३९ हजार ३०६ वसूल करण्यात आले. खेड तालुक्यात ३ कोटी ५ लाख ६८ हजार ३० वसूल करण्यात आले. तर मुळशी तालुक्यातून २ कोटी २९ लाख ५३ हजार ९ रुपयांची वसूली करण्यात आली आहे.

कोट

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांनी ग्रामपंचायतीचे कर भरले नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली होती. ती भरण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत थकीत कर भरले. लोकअदालतीतही अनेक प्रकरणे निकालात काढण्यात आली. पुढच्या वर्षीही या प्रकारच्या लोकअदालतीच्या आयोजन करून करवसुली केली जाणार आहे.

- सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

चौकट

रस्ते नाही, पाणी नाही मग आम्ही कर का भरायचा?

आमच्या गावात रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. काही ठिकाणी वीजही नाही. गावात जर पायाभूत सुविधाच नसतील तर आम्ही कर का भरायचा असा सवाल अनेक ग्रामस्थांनी लोक अदालतीत केला. मात्र, सेवा शुल्क नसून ग्रामपंचायतींचा कर आहे. तो भरणे गरजेचे आहे, असे सांगून नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.