शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

थकबाकी वसुलीने ग्रामपंचायत मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कराची रक्कम अनेकांनी थकीत ठेवली होती. ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्यामुळे कार्यालयाचे भाडे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कराची रक्कम अनेकांनी थकीत ठेवली होती. ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्यामुळे कार्यालयाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, पथदिव्यांची बिले भरणे कठीण झाले होते. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागातर्फे शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २२ हजार ७६६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत १५ कोटी ७९ लाख ७९ हजार १६७ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवसांत वसुली झाल्याने ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे अनेकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली नाही. ग्रामस्थांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला पैशांची आवश्यकता असते. कामगारांचे पगार, पाईपलाईन फुटणे, पथदिव्यांचे वीजबिल भरणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. काही ग्रामस्थांना अनेक वर्षे नोटीस देऊनही ते घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याने ग्रामपंचायतींनी न्यायालयात धाव घेतली होती. थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवून शनिवारी (दि. २५) राष्ट्रीय लोकअदालत न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण जिल्ह्यात लोकअदालत न्यायालयामध्ये ही प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात जवळपास ६५ हजार १२५ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यातत आले होते. तर ४७ कोटी ६२ लाख ८२ हजार २९२ रुपयांच्या वसूलीचे उद्दीष्ट ग्रामपंचायत विभागाचे होते. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवत अनेक प्रकरणे निकाली काढले. यात प्रशासनाला १५ कोटी ७९ लाख ७९ हजार १६७ रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.

चौकट

सर्वाधिक वसुली शिरूर, खेड, मुळशी तालुक्यात

जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीत सर्वाधिक वसुली शिरुर, खेड, मुळशी तालुक्यातून झाली. शिरूर तालुक्यातून ५ कोटी ११ लाख ३९ हजार ३०६ वसूल करण्यात आले. खेड तालुक्यात ३ कोटी ५ लाख ६८ हजार ३० वसूल करण्यात आले. तर मुळशी तालुक्यातून २ कोटी २९ लाख ५३ हजार ९ रुपयांची वसूली करण्यात आली आहे.

कोट

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांनी ग्रामपंचायतीचे कर भरले नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली होती. ती भरण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत थकीत कर भरले. लोकअदालतीतही अनेक प्रकरणे निकालात काढण्यात आली. पुढच्या वर्षीही या प्रकारच्या लोकअदालतीच्या आयोजन करून करवसुली केली जाणार आहे.

- सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

चौकट

रस्ते नाही, पाणी नाही मग आम्ही कर का भरायचा?

आमच्या गावात रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. काही ठिकाणी वीजही नाही. गावात जर पायाभूत सुविधाच नसतील तर आम्ही कर का भरायचा असा सवाल अनेक ग्रामस्थांनी लोक अदालतीत केला. मात्र, सेवा शुल्क नसून ग्रामपंचायतींचा कर आहे. तो भरणे गरजेचे आहे, असे सांगून नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.