शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक: संख्याबळासाठी पक्षांचे दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:17 IST

पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ बिनविरोध व उर्वरित १७३ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढण्यास बंदी असल्यामुळे निवडणुकीपर्र्यंत गावकी, भावकीचे राजकारण तापले होते.

पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ बिनविरोध व उर्वरित १७३ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढण्यास बंदी असल्यामुळे निवडणुकीपर्र्यंत गावकी, भावकीचे राजकारण तापले होते. मात्र निकालानंतर आता पक्षीय राजकारण पेटले आहे. संख्याबळासाठी आता दावे प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आघाडीवर असून काँग्रेसदुसºया क्रमांकावर आहे. शिवसेनेलाही शिरूर, हवेली लोकसभा मतदार संघात बºयापैकी चांगले यश मिळाले आहे. सत्ताधारी भाजपाला मात्र या निवडणुकीत गावकीच्या राजकारणात म्हणावे तसे शिरता आले नाही. ११ ग्रामपंचायती त्यांना मिळाल्या आहेत. आता निवडून आलेल्या सरपंचांना सत्काराचे आमंत्रण देवून तो आपलाच असे दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.शिरूरमध्ये भाजपाला आत्मपरीक्षणाची गरजशिरूर : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व राखत विधान सभेच्या पराभवानंतरही त्यानंतरच्या निवडणुकांतील विजयी घोडदौड सुरू ठेवण्यात यश मिळविले. भाजपा पुन्हा बॅकफूटवर राहिल्याचे दिसून आले.विधानसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार शिरूर हवेली या मतदारसंघातून निवडून आला. तालुक्यातील बहुतांशी संस्थांवर वर्चस्व असताना झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी मोदीलाट, वगैरे या पराभवाची कारणे आहेत. या निवडणुकीनंतर झालेल्या घोडगंगा सरकारी साखर कारखाना, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती तसेच खरेदी-विक्री संघ आदी निवडणुकांत मात्र राष्ट्रवादीने मुसंडी मारली.दरम्यान या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. प्रथमच जनतेतून सरपंच निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली.यातही राष्ट्रवादीने चार पैकी तीन ग्रामपंचायतीत आपले वर्चस्व राखले. करंजावणे येथे जो सरपंच निवडला गेला त्याने मी कोणत्याच पक्षाचा नाही, असे सांगितल्याने ती ग्रामपंचायत भाजपची म्हणण्यासही जागा राहिली नाही.विधानसभेनंतर झालेल्या सर्वच निवडणुका हारल्याने भाजपा जनतेने कार्य अर्थ काढायचा तो काढला आहे. तालुक्यातील थोड्याच ग्रामपंचायतीचे निवडणुका होत्या. मात्र ज्या गावांत भाजपाचे बळ आहे, त्या मांडवगण फराटा गावांत राष्ट्रवादीचा सरपंच निवडणून आल्याने भाजपालाआता आत्मपरिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.ंसरपंचपदी रासपा-भाजपा महायुतीचे बाबा जाधव विजयीराजेगाव : लोणारवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रासपा-भाजपा महायुतीप्रणित श्री मुंजाबा ग्रामविकास पॅनलचे बाबा नामदेव जाधव यांचा ३० मतांनी विजय झाला.राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित श्री मुंजाबा परिवर्तन पॅनलचे ९ पैकी ५ उमेदवार विजयी झाल्याने या ग्रामपंचायतीत सरपंच एकाचा व बहुमत दुसºयाचे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.नुकत्याच अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत ९६४ पैकी ८९१ म्हणजे ९२:४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पूर्व भागातील एकमेव असणाºया या निवडणुकीकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले होते.सरपंचपद अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षित होते. एकास एक अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बाबा नामदेव जाधव यांना ४६० व राजेंद्र दामोधर लोंढे यांना ४३० मते मिळाली. ३० मतांनी जाधव विजयी झाले.रासपा-भाजपाप्रणित श्री मुंजाबा ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अंबादास गाढवे, गोरख गाढवे, उपसरपंच हनुमंत वाळुंजकर, संदीप वाघ आणि दत्तात्रय पुणेकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित श्री मुंजाबा परिवर्तन पॅनलचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माणिकराव पुणेकर, हरिश्चंद्र वाळूंजकर, दशरथ वाघ, वाल्मीक पुणेकर आणि श्रीधर गाढवे यांनी केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मंगेश नेवसे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गावकामगार तलाठी दीपक पांढरपट्टे यांनी काम पाहिले.या वेळी चेअरमन गोरख गाढवे म्हणाले, की प्रस्थापितांविरोधात आम्ही निवडणूक लढविली होती. आठ दिवसांपूर्वी सोसायटीच्या निवडणुकीत १३-० आणि आज सरपंचपद आम्हाला मिळाले. हा जनतेने विकासकामाला दिलेला कौल आहे.माणिक पुणेकर म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत विकासकामे करताना सत्ताधाºयांनी पैसे खाल्ले; तसेच पैसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वाटले. अगदी निसटत्या मतांनी सरपंचपद हरलो असलो तरी आमचे जास्त सदस्य निवडून आल्याने बहुमत आमचेच असून उपसरपंच आमचाच होणार आहे. एका अर्थाने विरोधकांचा हा नैतिक पराभवच आहे.भोर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींत परिवर्तनभोर : भोर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अधिक जागा मिळाल्याचा दावा केला असला तरी संमिश्र यश मिळाले आहे. तर शिवसेना, भाजपाला यश मिळवता आले नाही. सदर निवडणुकीत जेवणावळी, भेटवस्तू व पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे अनेक गावांत क्रॉस व्होटिंग होऊन अनेक दिग्गज नेत्यांच्या ग्रामपंचायती हातातून गेल्या असून, परिवर्तन झाले तर अनेकांनी आपले गड कायम राखले आहेत.काही गावांत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत वेळवंड व ब्राह्मणघर गावांत दोन मतांनी सरपंच विजयी झाले आहेत. तर म्हाकोशी येथे सदस्य निवडणुकीत समान मते पडल्याने चिठ्ठीवर निवड जाहीर करण्यात आली.वेल्हे रोडवरील कुरुंगवडी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवून सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव केला. तर कर्नावड ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या पॅनलने विरोध शिवसेना राष्ट्रवादी पॅनलचा दारुण पराभव करून सरपंचपदासह सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आणि पुन्हा सत्ता ताब्यात ठेवली.भाटघर धरण भागातील पसुरे ग्रामपंचायत निवडणुकीत काँॅग्रेस विरुद्ध सत्ताधारी राष्ट्रवादी पॅनलमध्ये लढत झाली. काँॅग्रेसने सरपंचपदासह चार जागा मिळवत गतवेळी गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणली. राजघर, येवली, बारे खुर्द, वाठारहिंगे ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसने सर्व जागा जिंकून विजय मिळवला. भांबवडे व कारी ग्रामपंचायतीत सरपंच काँग्रेसचा, तर सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसने वाठार हि.मा, ब्राह्मणघर वे. खो या ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या पॅनलचा पराभव केला आहे. तर सांगवी तर्फे भोर, तेलवडी, कासुर्डी. गु.मा, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, वीरवाडी, सांगवी भिडे या ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. ५४ पैकी २८ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी सांगितले तर पारवडी ग्रामपंचायत संभाजी ब्रिगेडच्या ताब्यात गेली आहे.नसरापूर गणातील निवडणूक लागलेल्या ९ पैकी ७ ग्रामपंचायती माजी उपसभापती विक्रम खुटवड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या ताब्यात आल्याचे पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी सांगितले.दौंडला ६ ग्रामपंचायतींवर थोरात गटाचे वर्चस्वदौंड : तालुक्यात ८ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला, तर विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सरपंचपदाच्या दोन जागा मिळाल्या.थेट ग्रामस्थांतून सरपंचपदाला मतदान असल्याने लागलेल्या निकालाला गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहे.राजकीय पक्ष वगळता दौंड तालुक्यात कुल-थोरात या दोन गटापुढे राजकारण फिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. कारण विरोधक हा प्रबळ नसल्याने त्याचा फायदा मात्र कुल-थोरात गटाला मिळत आहे.डाळिंब, नांदूर, बोरीभडक, दापोडी, पाटेठाण, देवकरवाडी या सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर थोरात गटाचे, तर दहिटणे आणि लोणारवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर राहुल कुल गटाचे वर्चस्व राहिले.दरम्यान आठ ग्रामपंचायतींत निवडून आलेले सदस्य हे दोन्ही गटांतील आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने तालुक्यात गटातटाचे राजकारण उफाळून आले होते. तर दोन्ही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.सध्याच्या परिस्थितीत विद्यमान आमदार राहुल कुल यांनी तालुक्यात विकासासाठी ९00 कोटी रुपये आणल्याचा गाजावाजा केला होता. मात्र मतदारांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाठोपाठ आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कुल गटाकडे पाठ फिरवली असल्याची वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे भीमा पाटस कारखान्याचा फटका दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतदेखील राहुल कुल यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार कारखाना सुरू झाल्याशिवाय आणि त्यातील समस्या पूर्वपदावर आल्याशिवाय कुल यांचे राजकीय भवितव्य अंधातरी राहील, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.दापोडी ग्रामपंचायतीला वास्तविक

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे