शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Pune: न्यायालयाच्या ताशेऱ्यांना राज्य सरकारच जबाबदार, काँग्रेसची टीका

By राजू इनामदार | Updated: October 14, 2023 17:33 IST

या सरकारला नैतिकतेची थोडी जरी चाड असली तरी त्यांनी सत्तात्याग करावा, अशी टीका तिवारी यांनी केली....

पुणे : आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून राज्याच्या इतिहासात प्रथमच इतके ताशेरे मारले गेले आहेत. याला अनैतिक राजकीय व्यवहार करत सत्तेवर आलेले राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. या सरकारला नैतिकतेची थोडी जरी चाड असली तरी त्यांनी सत्तात्याग करावा, अशी टीका तिवारी यांनी केली.

तिवारी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणात सभापतींना वेळेची मुदत दिली नसली तरी त्यांचे घटनात्मक अधिकार मान्य करून त्यांनाच याबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते, मात्र, त्याचा गैरअर्थ काढून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळेच मी दिरंगाई करणार नाही, पण घाईही करणार नाही, अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात होती. मात्र, आता न्यायालयानेच त्यावर प्रतिकूल मत व्यक्त करत वेळेत निर्णय घ्यावा, अशी समज त्यांना दिली. न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर आता तरी सभापतींनी आपल्या घटनादत्त अधिकार व तारतम्याचे भान ठेवून निकाल देतील अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड