शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कर्नाटकामध्ये राज्यपालांची घटनेप्रमाणेच कार्यवाही : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:48 IST

कर्नाटकमध्ये राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्यच कारण, ही कार्यवाही घटनेप्रमाणे आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या खळबळजनक वक्तव्याने काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्दे राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक नाहीकॉँग्रेस व जेडीयूचेच सरकार स्थापन होईलआजपर्यंतच्या इतिहासातील मोदी हे सर्वाधिक घाबरलेले पंतप्रधान

शिरूर : कर्नाटकामध्ये राज्यपालांनी भारतीय घटनेप्रमाणे कार्यवाही केली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे कॉँग्रेस व जनता दल सेक्युलर पक्षचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. शिरुर येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी वार्तालाप करताना ते म्हणाले, की राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जनता दल सेक्युलर पक्षला प्रथम संधी द्यायला हवी होती.

गोवा, मणिपूर व मेघालय या राज्यांत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असताना तिथे भाजपाने तेथील पक्षाला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. तो नियम कर्नाटकामध्ये का लागू झाला नाही? असे विचारले असता शिंदे म्हणाले, की ही राज्ये छोटी आहेत. तिथे भाजपाची चालबाजी लक्षात आही नाही. आता मात्र आम्ही अ‍ॅलर्ट आहोत. जनता दल सेक्युलर पक्षाशी निवडणूकपूर्व आघाडी का नाही केली, असे विचारले असता ते म्हणाले, की आघाडीचा प्रयत्न झाला; मात्र होऊ शकली नाही. पण, देवेगौडा यांचा पक्ष सेक्युलर असल्याने ते भाजपाबरोबर जाणार नाहीत, याची आम्हाला खात्री होती. शिंदे म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे-जे पंतप्रधान झाले (मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहनसिंग) त्यांपैकी कोणत्याही पंतप्रधानाने राज्यांच्या निवडणुकीत दोनपेक्षा जास्त सभा घेतल्या नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कर्नाटकात २३ सभा घेतल्या. एवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही कधी पाहिला नाही,अशी कोपरखळीही शिंदे यांनी मारली.कर्नाटकामधील निकालाचा महाराष्ट्रात होणाऱ्या  निवडणुकीवर काही परिणाम होईल का? असे विचारले असता शिंदे म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचा चलाखपणा माहीत झाला आहे. महागाई, नोटाबंदी तसेच जीएसटीमुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात सामाजिक समतेच्या विरोधात वातावरण आहे.

कुठे गेले ती ११ शिरे?

भारताच्या सीमेचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मी गृहमंत्री असताना सीमेवर जवान शहीद झाल्यावर मला विरोधक प्रश्न विचारायचे. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्या काळात चौपट सैनिक मारले जात आहेत. एका शिराच्या बदल्यात ११ शिरे आणण्याची भाषा करणाऱ्यांना कुठे गेले ती ११ शिरे, असा सवाल शिंदे यांनी या वेळी केला. कर्नाटकामधील निवडणुकीत भाजपाच्या विरोधात वातावरण होते, तरीही निकाल असा कसा लागला? याबाबत आश्चर्य व्यक्त करताना ईव्हीएमबाबत राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :ShirurशिरुरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८