शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

गोविंदांना दरवर्षी लावला जातो चुना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:42 IST

गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाटी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे.

ठळक मुद्देया उत्सवामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आणि त्याला बाजारी स्वरूप आल्यासारखेएकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर

हडपसर: शहरात चौकाचौकात मोठमोठ्या रक्कमे दहीहंडीचे बॅनर झळकत आहेत. गोविंदा पथकांना  गोकुळअष्टमीचे वेध लागले आहेत. सर्व ठिकाणी दहीहंडीचे मोठ्या वाजत- गाजत आपल्याच दहीहंडी इतरांपेक्षा कशी हटके असेल याकडे सर्व  नेते, कार्यकर्ते इच्छुक आहेत. यातला आकर्षणाचा मुद्दा म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसाठी ठेवलेले मोठ्या रक्कमांचे आकडे येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. पण आकर्षणापाठीमागे एक धक्कादायक आणि वेदनादायी सत्य दडलेले आहे. दरवर्षी गोविंदा पथकांना अक्षरश: या दहीहंडीच्या कार्यक्रमात चुना लावला जातो. गोविंदा पथकांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी निमित्त लावण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीच्या फलकांवरचे फुगवलेले रक्कमांचे आकडे फक्त जहिरातबाजीसाठी असतात. जाहीर केलेल्या रक्कमेच्या २५ टक्के रक्कम फक्त दहीहंडी फोडल्यानंतर आम्हाला मिळते. सेलिब्रिटी व डीजेवर भरमसाठ खर्च करून ज्यांचे मुख्य आकर्षण त्या पथकांना फक्त मोठ्या रक्कमेची आशा लावली जाते. मात्र, दरवर्षी बक्षिसांची रक्कम भली मोठी असते. मात्र, अनेक मंडळांनी बक्षिसाची रक्कम गेल्या काही वर्षी तोकडीच दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्ष पासून गोविंदांमध्ये नाराजी पसरली होती. गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाटी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे. ही अभिमानाची बाब असली तरी, बक्षीसाची रक्कम मात्र तेवढी मिळत नसल्याची खंत अनेक गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी अनेक मंडळांनी लाखो रुपयांची बक्षिसे देणार, अशी जाहिरात केली. मात्र, प्रत्यक्षात अगदी काही हजार रुपयेच हातात टेकवले, त्यामुळे गोविंदाचा हिरमोड झाला. गोविंदा रे गोपाळा अशी आरोळी ठोकत दहीहंडी फोडण्यासाठी एकच गलका सुरू होतो आणि प्रेक्षकांची गर्दी जमते. गोविंदा थरावर थर रचत असताना, त्यांच्या अंगावर पाणी मारले जाते. त्यामुळे एखादा गोविंदा अंग चोरतो आणि थर ढासळतात. गोविंदा पथक दक्षता घेत असल्यामुळे मोठे अनर्थ टळतात. मात्र, त्यातूनही एखादी दुर्घटना दरवर्षी घडतेच. तरीही गोविंदामधील जोष, उत्साह काही औरच असतो. शहराबरोबर उपनगर आणि ग्रामीण भागातही दहीहंडी उत्सवाचे पिक आले आहे. उत्सवाच्या माध्यमातून आपसातील मतभेद दूर व्हावेत, अशी संकल्पना असली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. प्रत्येक गावात, गल्लीबोळात, वस्तीमध्ये स्वतंत्र उत्सव होऊ लागले आहेत. उत्सवाला काहीसे गालबोट लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी नव्या विचाराची पेरणी करून समाजात दुही होणार याची काळजी घेणे गरजेचे आहे. या उत्सवामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आणि त्याला बाजारी स्वरूप आल्यासारखे झाले आहे. दहीहंडीच्या उद्घाटनासाठी लाखो रुपये खर्च करून मंडळे सिनेतारे-तारकांना बोलावतात. सिनेतारकांमुळे गर्दी वाढते आणि गोविंदा पथकेही आपोआप येतात. गोविंदा पथक हे बक्षिसासाठी नव्हे, तर आनंद म्हणून येतात, याचा विसर कदाचित बाजारू मंडळाां पडलेला दिसतो.दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना लाखो रुपयांची बक्षिसे देणार अशी जाहिरातबाजी करायची हा फंडा सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळे लाखाची बक्षिसे देत नाहीत, अशी ओरड आहे. 

टॅग्स :PuneपुणेDahi Handiदही हंडीPoliticsराजकारणfraudधोकेबाजी