शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 20:15 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

पुणे, दि. 16 -  अस्वस्थ करणाऱ्या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजात नक्की काय चाललंय हे कुणीच समजू शकलेले नाही. ते जाणून घ्यायचे झाल्यास धोका पत्करावा लागतो आणि ते धाडस केले तर शांतीपूर्ण जीवन कदाचित जगू शकणार नाही अशी धास्ती लोकांना वाटते, अशा शब्दात समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित रसास्वाद सिनेमाचा या शिबिराच्या समारोप वेळी ते बोलत होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्यामला वनारसे, सुषमा दातार आणि समन्वय सतीश जकातदार उपस्थित होते. गोविंद निहलानी यांच्या ती आणि इतर या चित्रपटाच्या अंगाने यावेळी चर्चा झाली. 

जेव्हा कधी अस्वस्थ करणाऱ्या घटना घडतात तेव्हा समाज हा पूर्णतः गोंधळलेल्या आणि भयग्रस्त वातावरणात असतो. शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात  आपल्याला आवाज तर उठवायचा असतो पण अपल्याला किन्वा कुटुंबाला काही होणार तर नाही ना? याची धास्ती  कायम असते.वास्तविक जगाला तोंड देणे इतके सोपे नसते, अशी समाजाची मानसिक अवस्था त्यांनी नेमकेपणे मांडली.

चित्रपट आणि नाटक यात विशेष फरक नसल्याचे सांगून निहलानी पुढे म्हणाले की समांतर चित्रपट आला तेव्हा हे नाटक आहे की चित्रपट ही चर्चा व्हायची. संवाद जास्त , एकाच ठिकाणचे दृष्य नसणे म्हणजे चित्रपट असे समजले जायचे. चित्रपट माध्यमाची जी बलस्थाने आहेत, त्याचा वापर व्हावा असा मतप्रवाह होता. मात्र फॉर्म कोणताही असो त्यातील आशय आणि मांडणी महत्वपूर्ण असते. जसे चित्र एक रंगाने काय किंवा पन्नास रंगांनी रंगविले तरी  त्यातून व्यक्त होणे गरजेचे असते.  आज दोन्ही माध्यमातील अंतर कमी झाले आहे. चांगल्या ठिकाणचे चित्रीकरण आणि मोठे कॅमेरे हे गरजेचेच असते असे नाही. माध्यम कुठलेही असले तरी त्यातून प्रभावशाली कलाकृती समोर येणे आवश्यक आहे. समारोपानंतर शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली.