शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 20:15 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

पुणे, दि. 16 -  अस्वस्थ करणाऱ्या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजात नक्की काय चाललंय हे कुणीच समजू शकलेले नाही. ते जाणून घ्यायचे झाल्यास धोका पत्करावा लागतो आणि ते धाडस केले तर शांतीपूर्ण जीवन कदाचित जगू शकणार नाही अशी धास्ती लोकांना वाटते, अशा शब्दात समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित रसास्वाद सिनेमाचा या शिबिराच्या समारोप वेळी ते बोलत होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्यामला वनारसे, सुषमा दातार आणि समन्वय सतीश जकातदार उपस्थित होते. गोविंद निहलानी यांच्या ती आणि इतर या चित्रपटाच्या अंगाने यावेळी चर्चा झाली. 

जेव्हा कधी अस्वस्थ करणाऱ्या घटना घडतात तेव्हा समाज हा पूर्णतः गोंधळलेल्या आणि भयग्रस्त वातावरणात असतो. शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात  आपल्याला आवाज तर उठवायचा असतो पण अपल्याला किन्वा कुटुंबाला काही होणार तर नाही ना? याची धास्ती  कायम असते.वास्तविक जगाला तोंड देणे इतके सोपे नसते, अशी समाजाची मानसिक अवस्था त्यांनी नेमकेपणे मांडली.

चित्रपट आणि नाटक यात विशेष फरक नसल्याचे सांगून निहलानी पुढे म्हणाले की समांतर चित्रपट आला तेव्हा हे नाटक आहे की चित्रपट ही चर्चा व्हायची. संवाद जास्त , एकाच ठिकाणचे दृष्य नसणे म्हणजे चित्रपट असे समजले जायचे. चित्रपट माध्यमाची जी बलस्थाने आहेत, त्याचा वापर व्हावा असा मतप्रवाह होता. मात्र फॉर्म कोणताही असो त्यातील आशय आणि मांडणी महत्वपूर्ण असते. जसे चित्र एक रंगाने काय किंवा पन्नास रंगांनी रंगविले तरी  त्यातून व्यक्त होणे गरजेचे असते.  आज दोन्ही माध्यमातील अंतर कमी झाले आहे. चांगल्या ठिकाणचे चित्रीकरण आणि मोठे कॅमेरे हे गरजेचेच असते असे नाही. माध्यम कुठलेही असले तरी त्यातून प्रभावशाली कलाकृती समोर येणे आवश्यक आहे. समारोपानंतर शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली.