शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 20:15 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

पुणे, दि. 16 -  अस्वस्थ करणाऱ्या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजात नक्की काय चाललंय हे कुणीच समजू शकलेले नाही. ते जाणून घ्यायचे झाल्यास धोका पत्करावा लागतो आणि ते धाडस केले तर शांतीपूर्ण जीवन कदाचित जगू शकणार नाही अशी धास्ती लोकांना वाटते, अशा शब्दात समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित रसास्वाद सिनेमाचा या शिबिराच्या समारोप वेळी ते बोलत होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्यामला वनारसे, सुषमा दातार आणि समन्वय सतीश जकातदार उपस्थित होते. गोविंद निहलानी यांच्या ती आणि इतर या चित्रपटाच्या अंगाने यावेळी चर्चा झाली. 

जेव्हा कधी अस्वस्थ करणाऱ्या घटना घडतात तेव्हा समाज हा पूर्णतः गोंधळलेल्या आणि भयग्रस्त वातावरणात असतो. शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात  आपल्याला आवाज तर उठवायचा असतो पण अपल्याला किन्वा कुटुंबाला काही होणार तर नाही ना? याची धास्ती  कायम असते.वास्तविक जगाला तोंड देणे इतके सोपे नसते, अशी समाजाची मानसिक अवस्था त्यांनी नेमकेपणे मांडली.

चित्रपट आणि नाटक यात विशेष फरक नसल्याचे सांगून निहलानी पुढे म्हणाले की समांतर चित्रपट आला तेव्हा हे नाटक आहे की चित्रपट ही चर्चा व्हायची. संवाद जास्त , एकाच ठिकाणचे दृष्य नसणे म्हणजे चित्रपट असे समजले जायचे. चित्रपट माध्यमाची जी बलस्थाने आहेत, त्याचा वापर व्हावा असा मतप्रवाह होता. मात्र फॉर्म कोणताही असो त्यातील आशय आणि मांडणी महत्वपूर्ण असते. जसे चित्र एक रंगाने काय किंवा पन्नास रंगांनी रंगविले तरी  त्यातून व्यक्त होणे गरजेचे असते.  आज दोन्ही माध्यमातील अंतर कमी झाले आहे. चांगल्या ठिकाणचे चित्रीकरण आणि मोठे कॅमेरे हे गरजेचेच असते असे नाही. माध्यम कुठलेही असले तरी त्यातून प्रभावशाली कलाकृती समोर येणे आवश्यक आहे. समारोपानंतर शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली.