शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 00:46 IST

केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा.

पुणे : केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. त्यामुळे उत्पादकांना न्याय देता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे ही आमची अट मान्य झाली आहे. त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होत आहे. जाहीर केलेला दर देण्यास टाळाटाळ झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल. यापूर्वी महानंदच्या माध्यमातून एक ब्रँड करण्याचा प्रयत्न झाला होता. महानंद राजकारण्यांच्या हातात सापडल्याने, या प्रयोगाचे वाटोळे झाले. मात्र, पुन्हा असा प्रयोग करण्यास हरकत नाही. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यात ५१ टक्के हिस्सा राज्याचा आणि उर्वरीत खासगी गुंतवणुकीतून उभारावा. महानंद आणि आरेची यंत्रणा संबंधित कंपनीकडे हस्तांतरीत करावी. त्यामुळे राज्याचा चांगला ब्रँड होईल. परिणामी आपणच गुजरातमध्ये दूध विकू शकू, असे शेट्टी म्हणाले. पाच वर्षांत नाबार्डच्या माध्यमातून गोदामे, शीतगृहे, पॉलिहाऊसला अनुदान दिले गेले नाही. त्यामुळे शेतमाल साठविण्याचे काम ठप्प पडले आहे. केंद्र सरकार आॅनलाईनचा पुरस्कार करीत आहे. त्यासाठी शीतकरण, ड्रायर हाऊस, प्रतवारी करण्याची सुविधा निर्माण करीत नाही. अशा पायाभूत सुविधाच न दिल्यास शेतमालाला भाव कसा मिळेल, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.हमीभावाचे खासगी विधेयक मांडणारशेतकºयांना कर्जमुक्ती, हमीभाव मिळविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि न देणाºयावर १० ते १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी अशा मागणीसाठी संसदेत खासगी विधेयक मांडणार असून, त्याला २२ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी