शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सत्तेचा मार्ग थेट दिल्ली नाही व्हाया अयोध्या : हुकूमचंद सावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 12:06 IST

देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे...

ठळक मुद्देविश्व हिंदू परिषद पुणेतर्फे धर्मसभेचे आयोजन 

पुणे : रामजन्मभूमी हा सर्वांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी करु शकते, त्याकरीता न्यायालय किंवा समाजाला विचारण्याची गरज नाही. आता देशामध्ये सत्तेत जाण्याचा मार्ग थेट दिल्ली नसून व्हाया अयोध्या आहे. त्यामुळे कॉंग्रेससह प्रत्येक पक्षाचे राजकारणी येथे येत आहेत. राष्ट्रीय चरित्र निर्मितीकरीता राममंदिर आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांनी केले. विश्व हिंदू परिषद पुणेच्या वतीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करावा, या मागणीसाठी पुण्यात बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले.  यावेळी कागशिला पिठाधिश्वर  महंत साध्वी प्रज्ञा भारतीय जी, प.पू. अतुलशास्त्री भगरे गुरुजी, दादा वेदक, पांडुरंग राऊत, रवींद्र वंजारवाडकर, सभेचे संयोजक किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ यांसह संत महात्म्य उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे यांना राममंदिर निर्माण कायद्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. साध्वी प्रज्ञा भारतीय म्हणाल्या, भारत देश स्वतंत्र झाला, नागरिक स्वतंत्र झाले, मात्र आजही रामलल्ला स्वतंत्र नाही. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर निर्माणाकरीता पुढाकार घ्यायला हवा. राज्य व केंद्र सरकारने जर ठरविले, तर मंदिर उभारणी सहज शक्य आहे. तीन तलाक सारखा कायदा न्यायालय करु शकते, मग राममंदिर निर्माणाचा कायदा का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.     प.पू.अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले, देशातील १०० कोटी भारतवासियांची वज्रमूठ जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माणाचे कार्य अशक्य आहे. सरकारच्या भरवशावर राहणे योग्य नाही. कोणाला न दुखावता राममंदिर होणार नाही. त्यामुळे मंदिर निर्मितीकरीता रामभक्तांची शक्ती एकवटली पाहिजे़खासदार अनिल शिरोळे यांनी देखील राममंदिर उभारणीकरीता सरकार आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. धनंजय गायकवाड, नितीन महाजन, अतुल सराफ, गणेश वनारसे, नाना क्षीरसागर, केतन घोडके, श्रीपाद रामदासी आदींनी सभेच्या आयोजनात सहभाग घेतला. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव उर्फ भाऊराव कुदळे यांनी प्रास्ताविक केले. किशोर चव्हाण यांनी निवेदनाचे वाचन केले. श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.   

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरGovernmentसरकार