शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

शासकीय जमीन हडपली; आयआरबी विरोधात दोषारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 04:01 IST

लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील जमीन हडपल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांच्या विरोधात सीबीआय न्यायालयात बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले

पुणे : लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील जमीन हडपल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांच्या विरोधात सीबीआय न्यायालयात बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले. बनावट कागदपत्र बनवणे, कटकारस्थान रचून फसवणूक करणे, भ्रष्टाचार करणे याबाबी तपासात निष्पन्न झाल्याचे सीबीआयने दोषारोपपत्रात म्हटले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी याबाबत तक्रार दिली होती. दोषारोप दाखल झालेल्या म्हैसकर यांच्यासह ८ जणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.राज्य शासनाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत पिंपळोली गावतील शेतकºयांकडून रस्ते विकास महामंडळासाठी जमीन अधिग्रहित केली होती. आयआरबी इन्फ्रास्टक्चर प्रा.लि., आर्यन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट प्रा.लि व ज्यो डेव्हलपमेंटकार्पोरेशन प्रा.लि. यांनी ही जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याची तक्रार सतीश शेट्टी यांनी २००९ मध्ये लोणावळा पोलीस ठाण्यात केली होती. जानेवारी २०१० मध्ये शेट्टी यांचा खून झाला. पोलिसांनी तपास करून २०१२ मध्ये वडगाव मावळ न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, उच्च न्यायालयात प्रकरण आल्यावर सीबीआयने पुन्हा तपास सुरू केला. यात लोणावळ्यातील निलंबित दुय्यम निबंधक अश्विनी क्षीरसागर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हस्तांतरण प्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले. आरबीआय कंपनीने बेकायदेशीरपणे जमीन हडपल्याची बाबही समोर आली.आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह वकील अजित कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, निलंबित दुय्यम निबंधक अश्विनी क्षीरसागर, अनंत काळे, सखाराम हराळे, संतोष बोत्रा, नवीनकुमार राय, शांताराम दहिभाते, विष्णू बोंबले, अतुल भेगडे, अशोक कोंडे, नरिंदर खंडारी, सिराज बागवान, पंकज ढवळे यांच्याविरोधात सीबीआयचे वकील अ‍ॅड. मनोज चलाढणे आणि अ‍ॅड. विजयकुमार ढाकणे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.आयआरबीमार्फत संलग्न आर्यन इन्फ्रास्टक्चर व ज्यो. प्रा. लि. या दोन कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. रस्ते विकास मंडळातर्फे महामार्ग विकासासाठी शासनाच्या वतीने याच दोन कंपन्यांनी शेतकºयांकडून ७३.८८ हेक्टर जमीन ताब्यात घेतली होती.याप्रकरणी शेट्टी यांनी तक्रार दिली होती. दोषारोप दाखल झालेल्या म्हैसकर यांच्यासह८ जणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपींनी देश सोडून जाऊ नये. दोन सुनावणीस आरोपी गैरहजर राहिले तर त्यांचा जामीन रद्द करण्यात येईल, अशी अट यावेळी घातली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग