शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

शासकीय भरतीसाठी महापोर्टलची ऑनलाईन पद्धत विद्यार्थ्यांची डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 14:34 IST

शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे...

ठळक मुद्देमहापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार

प्रशांत ननवरे - बारामती :  राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ही प्रक्रिया केली जाते. शासनाच्या सर्वच विभागाच्या परीक्षा या महापोर्टलवर घेतल्या जात आहेत. मानवी हस्तक्षेप टाळावा, परीक्षा वेळेवर लवकर पार पाडावी आदी हेतूने परीक्षा देण्यासाठी वापर होणारी महापोर्टलची पद्धत   विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भरती सुरू आहे. मात्र, महापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. एकाच पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला संगणकाच्या कमी उपलब्धतेमुळे वेळ लागतो. यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी देखील जातो. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. त्यातून काहींच्या वाट्याला सोपा तर काहींच्या वाट्याला अवघड पेपर येतो. त्यावर परीक्षेची गुणवत्ता ठरली जाते. परिणामी विद्यार्थी या  पद्धतीमुळे नाखुश आहे. शासकीय परीक्षा खासगी सायबर कॅफेत घेतली जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी सामुहिक कॉपी प्रकार वाढण्याची भीती विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार होत असल्याची विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यातून गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होते. एकप्रकारे हायटेक कॉपीचा हा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रामाणिक अभ्यास करणारा विद्यार्थी या पद्धतीमुळे निराश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू केलेल्या महापोर्टलद्वारे खासगी सायबर केंद्रावर परीक्षा घेत आहे. या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे गैरप्रकार होण्याची भीती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशिवाय होणाऱ्या परीक्षा या पोर्टलवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे  एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर स्वायत्त मंडळ निर्माण करून परीक्षा घ्याव्यात. शासनाने पूर्वी  प्रमाणेच आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी जोर धरत आहे. .......* पूर्वीचीच पद्धत होती बरी : विद्यार्थ्यांच्या भावनापूर्वी ऑफलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्याला त्याचे गुण, त्याने सोडविलेले प्रश्न आदी माहिती मिळत असे. त्यामुळे तुलनेने आॅफलाईन पद्धत विद्यार्थ्यांसाठी पारदर्शी होती. गरज भासल्यास विद्यार्थ्यांना न्यायालयात त्यांच्या उत्तर पत्रिका पुरावा स्वरूपात सादर करणे शक्य होते. मात्र, महापोर्टलमुळे परीक्षेचा कोणताही पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती राहत नाही. न्यायालयात जाण्यासाठी असणारा मूळ आधार हरविल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.......महापोर्टलमध्ये संगणकावर शुल्काची झालेली वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. शासनाच्या वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय परीक्षा नवीन पद्धतीद्वारे घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका बनविणे, परीक्षा केंद्र सुचविणे, परीक्षा घेणे, उत्तर पत्रिका तपसणे, निकाल लावणे ही सर्व कामे महापोर्टल करीत आहे. .........

टॅग्स :Baramatiबारामतीonlineऑनलाइन