शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शासकीय भरतीसाठी महापोर्टलची ऑनलाईन पद्धत विद्यार्थ्यांची डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 14:34 IST

शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे...

ठळक मुद्देमहापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार

प्रशांत ननवरे - बारामती :  राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ही प्रक्रिया केली जाते. शासनाच्या सर्वच विभागाच्या परीक्षा या महापोर्टलवर घेतल्या जात आहेत. मानवी हस्तक्षेप टाळावा, परीक्षा वेळेवर लवकर पार पाडावी आदी हेतूने परीक्षा देण्यासाठी वापर होणारी महापोर्टलची पद्धत   विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भरती सुरू आहे. मात्र, महापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. एकाच पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला संगणकाच्या कमी उपलब्धतेमुळे वेळ लागतो. यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी देखील जातो. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. त्यातून काहींच्या वाट्याला सोपा तर काहींच्या वाट्याला अवघड पेपर येतो. त्यावर परीक्षेची गुणवत्ता ठरली जाते. परिणामी विद्यार्थी या  पद्धतीमुळे नाखुश आहे. शासकीय परीक्षा खासगी सायबर कॅफेत घेतली जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी सामुहिक कॉपी प्रकार वाढण्याची भीती विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार होत असल्याची विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यातून गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होते. एकप्रकारे हायटेक कॉपीचा हा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रामाणिक अभ्यास करणारा विद्यार्थी या पद्धतीमुळे निराश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू केलेल्या महापोर्टलद्वारे खासगी सायबर केंद्रावर परीक्षा घेत आहे. या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे गैरप्रकार होण्याची भीती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशिवाय होणाऱ्या परीक्षा या पोर्टलवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे  एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर स्वायत्त मंडळ निर्माण करून परीक्षा घ्याव्यात. शासनाने पूर्वी  प्रमाणेच आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी जोर धरत आहे. .......* पूर्वीचीच पद्धत होती बरी : विद्यार्थ्यांच्या भावनापूर्वी ऑफलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्याला त्याचे गुण, त्याने सोडविलेले प्रश्न आदी माहिती मिळत असे. त्यामुळे तुलनेने आॅफलाईन पद्धत विद्यार्थ्यांसाठी पारदर्शी होती. गरज भासल्यास विद्यार्थ्यांना न्यायालयात त्यांच्या उत्तर पत्रिका पुरावा स्वरूपात सादर करणे शक्य होते. मात्र, महापोर्टलमुळे परीक्षेचा कोणताही पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती राहत नाही. न्यायालयात जाण्यासाठी असणारा मूळ आधार हरविल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.......महापोर्टलमध्ये संगणकावर शुल्काची झालेली वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. शासनाच्या वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय परीक्षा नवीन पद्धतीद्वारे घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका बनविणे, परीक्षा केंद्र सुचविणे, परीक्षा घेणे, उत्तर पत्रिका तपसणे, निकाल लावणे ही सर्व कामे महापोर्टल करीत आहे. .........

टॅग्स :Baramatiबारामतीonlineऑनलाइन