शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सरकारकडून सांप्रदायिकतेला खतपाणी - मीराकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 03:19 IST

जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होते. पण काही हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली जातीप्रथा का नष्ट होत नाही? जातीप्रथेने आजपर्यंत समाजाचे अतोनात नुकसान तर झालेच

पुणे : जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होते. पण काही हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली जातीप्रथा का नष्ट होत नाही? जातीप्रथेने आजपर्यंत समाजाचे अतोनात नुकसान तर झालेच, पण कायम देशाच्या लोकशाही प्रणाली आणि सर्वधर्मसमभाव तत्वाला प्रचंड धोका निर्माण केला आहे. त्यात सध्याचे सरकार हे सांप्रदायिकतेला खतपाणी घालण्याचे काम करत आहे, असा आरोप लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांनी केला आहे. ‘ये मेरे दिल की बात हैं’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.डॉ. विकास आबनावे लिखित ‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान’ या बाबू जगजीवनराम यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. या वेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, आदी उपस्थित होते.मीराकुमार म्हणाल्या, धर्म नेमका काय कार्य करतो, हा सातत्याने मनाला भिडणारा प्रश्न आहे. माणसाच्या आतील मानवतेला देवत्व प्राप्त करुन देतो की, शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करतो. गेल्या काही वर्षात समाजात वाढणारी सांप्रदायिकता व त्यातून उत्पन्न होणारी अराजकता हा चिंतेचा विषय आहे. समाजातील काही घटकांना आजही कित्येक ठिकाणी मंदिर प्रवेशास बंदी आहे. कुठलेही सरकार असो ते ज्या काही योजना महिला, दलित, अल्पसंख्यांक किंवा इतर दुर्लक्षित घटकांसाठी राबविते, हा त्यांच्यावर केलेला उपकार आहे, अशा आविर्भावात असते. परंतु हा उपकार नाही सरकारचे ते आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी या लोकांनी सर्वस्व अर्पण केले आहे.केंद्र व राज्य सरकारबद्दल जनतेच्या मनात असलेल्या असंतोषामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचा विजय होईल, असे मीराकुमार यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघात ‘माध्यमांचे स्वातंत्र्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. माध्यमांना विरोध करणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीलाच विरोध केल्यासारखे आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन विजय झालेल्या भाजपच्या विरोधात आता सोशल मिडीयावर मोहीम सुरु झाली आहे. याचा परिणाम आगामी गुजरात निवडणुकीत दिसेल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस