शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणेकरांसाठी गुडन्यूज, पहिली 5G प्लस सेवा लोहगाव विमानतळावरुन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:27 IST

भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, आता, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जीओ आणि एअरटेल यांसारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार असून यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे.  

भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, आता, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे. राज्यात विमानतळावर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच ५ जी प्लस सेवा आहे. कंपनीकडून गुरुवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे, पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या हवाई प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. लोहगावच्या संपूर्ण विमानतळ कार्यक्षेत्रात ही सेवा कार्यरत असणार आहे. ५ जी स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांना हायस्पीड डेटा वापरुन या सेवाचा लाभ घेता येईल. त्यासाठी, ग्राहकांना सीम कार्ड बदलण्याची गरज नाही. ग्राहकांचे ४ जी सीमच ५ जीसाठी इनेबल असणार आहे. 

दरम्यान, एअरटेलने यापूर्वी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये, दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानीपत, आणि गुरुग्राम विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

5G चा वेग किती असेल?

मोबाइल डेटाच्या बाबतीत, 5G नेटवर्क तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड केले जातील. 4G मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.

२०२४ पर्यंत देशात सर्वत्र ५ जी

१ ऑक्टोबर २०२२ पासून भारतात एअरटेल 5जी लाँच होत आहे. भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. कंपनीने आठ शहरांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू करण्याची योजना असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.

टॅग्स :AirtelएअरटेलPuneपुणे5G५जीAirportविमानतळ