शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुणेकरांसाठी गुडन्यूज, पहिली 5G प्लस सेवा लोहगाव विमानतळावरुन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:27 IST

भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, आता, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जीओ आणि एअरटेल यांसारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार असून यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे.  

भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, आता, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे. राज्यात विमानतळावर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच ५ जी प्लस सेवा आहे. कंपनीकडून गुरुवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे, पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या हवाई प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. लोहगावच्या संपूर्ण विमानतळ कार्यक्षेत्रात ही सेवा कार्यरत असणार आहे. ५ जी स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांना हायस्पीड डेटा वापरुन या सेवाचा लाभ घेता येईल. त्यासाठी, ग्राहकांना सीम कार्ड बदलण्याची गरज नाही. ग्राहकांचे ४ जी सीमच ५ जीसाठी इनेबल असणार आहे. 

दरम्यान, एअरटेलने यापूर्वी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये, दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानीपत, आणि गुरुग्राम विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

5G चा वेग किती असेल?

मोबाइल डेटाच्या बाबतीत, 5G नेटवर्क तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड केले जातील. 4G मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.

२०२४ पर्यंत देशात सर्वत्र ५ जी

१ ऑक्टोबर २०२२ पासून भारतात एअरटेल 5जी लाँच होत आहे. भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. कंपनीने आठ शहरांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू करण्याची योजना असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.

टॅग्स :AirtelएअरटेलPuneपुणे5G५जीAirportविमानतळ