शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

ग्रामीण तरुणांसाठी कृषी क्षेत्रातील सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

विद्यार्थी मनापासून अभ्यास करून यशस्वी होतात. ही चांगली बाब आहे. त्यामध्ये ज्यांना वर्ग १ आणि वर्ग २ अधिकारी होण्याची ...

विद्यार्थी मनापासून अभ्यास करून यशस्वी होतात. ही चांगली बाब आहे. त्यामध्ये ज्यांना वर्ग १ आणि वर्ग २ अधिकारी होण्याची आवड आहे. त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. परंतु, यासाठी कालावधी किती लागेल हे सांगता येत नाही. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी चिकाटी आणि जिद्द असावी लागते.

स्पर्धा परीक्षा व्यतिरीक्त इतरही परीक्षा देऊन नोकरीच्या संधी कृषी पदवीधरांना आहेत. विविध बँकांमधील वेगवेगळी पदे विशेषत : कृषी अधिकारी, कृषी विभागातील वेगवेगळी पदे, जसे वेगवेगळ्या रोपवाटीका, बियाण्यांसंबंधीच्या कंपन्या, माहिती तंत्रज्ञानामधील कृषीसंबंधीच्या कंपन्या यामध्येही कृषी पदवीधरांना संधी आहेत. त्याचा उपयोग कृषी पदवीधरांनी आणि कृषी शाखांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांनी घ्यावा.

कृषीसंबंधी आवड असणाऱ्या तरुणांना नोकरीव्यतिरीक्त व्यवसायाच्याही संधी आहेत. या व्यवसायामध्ये बियाण्यांची निर्मीती आणि विक्री करून चालून स्वत:चा व्यवसाय करणे. बियाण्यांबरोबर खताचा व्यवसाय करून शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्याचे समाधान मिळवणे.

दर्जेदार रोपवाटिका तयार करून गरजू शेतकऱ्यांना फळझाडांची आणि भाजीपाल्यांची रोपे निर्माण करून त्यांची विक्री करून खताचाही यशस्वी व्यवसाय निर्माण करता येऊ शकतो. दर्जेदार बियाणे, दर्जेदार रोपनिर्मितीबरोबरच झाडांना आणि पिकांना लागणारी अन्नद्रव्यनिर्मिती जसे सेंद्रिय खतांची निर्मिती, जैविक खतांची निर्मिती‌ आणि गरजू शेतकऱ्यांना आवश्यक असणारा सल्ला देण्याची योजना उभारून स्वत:चा व्यवसाय करून ग्रामीण भागामध्ये यशस्वी उद्योजक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या उद्योगांच्या यादीत कलेलाही फार संधी आहेत. शेतकऱ्यांना हवी असणारी यंत्रे आणि अवजारे निर्मिती आणि त्यांची विक्री करण्याच्या संधी आहेत.

भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता वाढविण्याचे क्षेत्र अवगत केले आहे. तृणधान्ये, भाजीपाला, फळभाज्या, फळबागा, औषधी वनस्पती इत्यादीचे चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. परंतु, त्यांची विक्री व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक फायदा घेता येत नाही. पिकविलेल्या मालाचा बहुतेक नफा विक्री साखळीतील व्यापारी आणि दलाल घेत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचा माल शेतकऱ्यांनीच विकावा यासाठी भारत केंद्र आणि राज्य शासन पुढाकार घेत आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करावी.

शेतीमाल गरजू ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी पदवीधर आणि इतर पदवीधर तरुण चांगला व्यवसाय उभा करू शकतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. त्याचबरोबर तरुणांनाही चांगला व्यवसाय करण्याच्याही संधी प्राप्त होईल. त्यासाठी अनुदान मिळण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यात पिकविलेल्या मालाची थेट विक्री, पिकविलेल्या मालामध्ये प्रोसेसींग करून विक्री, दर्जेदार रोपांची विक्री, बियाणे निर्मिती आणि विक्री, सेंद्रिय आणि जैविक खतनिर्मिती व विक्री, रासायनिक खतांची विक्री, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री आदींचा समावेश करता येईल, वरील सर्व बाबींचा विचार करून ग्रामीण भागातील तरुणांनी यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी या संधीचा उपयोग करावा.

- डॉ. सुरेश पवार, कृषी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी