शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला

By admin | Updated: April 19, 2017 04:08 IST

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात मित्राच्या लग्नाहून घरी परतणारे दुचाकीवरील दोन निष्पाप तरुण जागीच ठार झाले असून अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ही घटना रविवारी (दि. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास भीमा-भामा पुलावर घडली. शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येत असलेल्या अवजड कंटेनरच्या (एमएच ०६ के ४४९१) चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. दरम्यान, शेलगाव (ता. खेड) येथून मित्राचा विवाह आटोपून घरी जात असलेल्या दुचाकीवर अवजड कंटेनर (एमएच १२ २९८४) गेला. सुमारे दीडशे ते दोनशे फूट अंतर दुचाकीला ओढत नेऊन कंटेनर दुचाकीसह भीमा-भामा नदीच्या पात्रात अर्धवट कोसळला. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील अमोल दत्ता शिंदे (वय २६) व नारायण रवींद्र शिंदे (वय २९, दोघेही रा. चंदननगर) यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. अन्य धनंजय गिरी (वय ३०, रा. चंदननगर) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाय व डोक्याला मोठी जखम झाली आहे. तसेच कंटेनरचालकही (नाव समजू शकले नाही.) जखमी झाला आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी धाव घेऊन रात्री उशिरा स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)