शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला

By admin | Updated: April 19, 2017 04:08 IST

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात मित्राच्या लग्नाहून घरी परतणारे दुचाकीवरील दोन निष्पाप तरुण जागीच ठार झाले असून अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ही घटना रविवारी (दि. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास भीमा-भामा पुलावर घडली. शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येत असलेल्या अवजड कंटेनरच्या (एमएच ०६ के ४४९१) चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. दरम्यान, शेलगाव (ता. खेड) येथून मित्राचा विवाह आटोपून घरी जात असलेल्या दुचाकीवर अवजड कंटेनर (एमएच १२ २९८४) गेला. सुमारे दीडशे ते दोनशे फूट अंतर दुचाकीला ओढत नेऊन कंटेनर दुचाकीसह भीमा-भामा नदीच्या पात्रात अर्धवट कोसळला. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील अमोल दत्ता शिंदे (वय २६) व नारायण रवींद्र शिंदे (वय २९, दोघेही रा. चंदननगर) यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. अन्य धनंजय गिरी (वय ३०, रा. चंदननगर) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाय व डोक्याला मोठी जखम झाली आहे. तसेच कंटेनरचालकही (नाव समजू शकले नाही.) जखमी झाला आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी धाव घेऊन रात्री उशिरा स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)