शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यसभेची आम्हाला किमान एक तरी जागा द्याच; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 31, 2024 16:19 IST

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत....

पुणे : पक्षाला महापालिकेत कधी मिळाली नव्हती ती एकहाती सत्ता मिळाली, एकाचवेळी सर्व विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून दिला, त्यामुळे राज्यसभेच्या ६ रिक्त जागांपैकी किमान एक जागा तरी पुणे शहराला द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहे.

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदार असतात. फक्त भाजपच्याच आमदारांची संख्या १०४ आहे. त्याशिवाय महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचेही आमदार भाजपकडेच आहे. या दोन गटांना प्रत्येकी एक जागा दिली तरीही भाजपकडे ३ जागा राहतात. त्यातील एक जागा पुण्याला द्यावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. सध्या पुण्याचे दिल्लीतील लोकनियुक्त प्रतिनिधित्व खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त आहे. त्यातच राज्यसभेतही कोणी नसल्यास पुण्याचे दिल्लीत कोणीच नाही अशी स्थिती होईल.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे आहेत. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांची जागा रिक्त होत आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच एका जागेवर आमचा राजकीय हक्कच आहे असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे शहराने मागील काही वर्षात प्रत्येक निवडणूकीत भाजपला साथ दिली आहे. एकाचवेळी खासदार, आमदार व महापालिकेतील नगरसेवक अशी सत्ता भाजपकडे होती. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. पुणेकरांनी इतके भरभरून मतदान केले असताना त्यांना डावलणे राजकीय दृष्ट्या योग्य होणार नाही असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यसभेत पुण्याचा किमान एक सदस्य असणे योग्य आहे. पक्षासाठीही ते चांगले होईल. त्यामुळे उमेदवार कोण ते पक्षाने ठरवावे, मात्र ६ रिक्त जागांपैकी किमान १ जागा पुणे शहराला द्यावी असे मत भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र लोकसभेची उमेदवारी पुण्यातून मिळावी यासाठीही ते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. राज्यसभेची जागा पुण्याला द्यायची की नाही याचा निर्णय केंद्रीय स्तरातूनच होणार असल्याने तिथेच जोर लावण्यात येत असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेत प्रतिनिधित्व असणे ही त्यात्या शहरासाठी गौरवाची गोष्ट असते. पुण्याला हा मान मिळावा या पदाधिकाऱ्यांच्या मतामध्ये काहीच गैर नाही. या जागांचा निर्णय पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेत असते. उमेदवार ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच असतो. त्यांच्यापर्यंत आम्ही ही मागणी पोहचवू. मागणी योग्य आहे असेच माझेही मत आहे.

- धीरज घाटे- शहराध्यक्ष, भाजप, पुणे

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा