शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्यसभेची आम्हाला किमान एक तरी जागा द्याच; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 31, 2024 16:19 IST

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत....

पुणे : पक्षाला महापालिकेत कधी मिळाली नव्हती ती एकहाती सत्ता मिळाली, एकाचवेळी सर्व विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून दिला, त्यामुळे राज्यसभेच्या ६ रिक्त जागांपैकी किमान एक जागा तरी पुणे शहराला द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहे.

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदार असतात. फक्त भाजपच्याच आमदारांची संख्या १०४ आहे. त्याशिवाय महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचेही आमदार भाजपकडेच आहे. या दोन गटांना प्रत्येकी एक जागा दिली तरीही भाजपकडे ३ जागा राहतात. त्यातील एक जागा पुण्याला द्यावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. सध्या पुण्याचे दिल्लीतील लोकनियुक्त प्रतिनिधित्व खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त आहे. त्यातच राज्यसभेतही कोणी नसल्यास पुण्याचे दिल्लीत कोणीच नाही अशी स्थिती होईल.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे आहेत. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांची जागा रिक्त होत आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच एका जागेवर आमचा राजकीय हक्कच आहे असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे शहराने मागील काही वर्षात प्रत्येक निवडणूकीत भाजपला साथ दिली आहे. एकाचवेळी खासदार, आमदार व महापालिकेतील नगरसेवक अशी सत्ता भाजपकडे होती. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. पुणेकरांनी इतके भरभरून मतदान केले असताना त्यांना डावलणे राजकीय दृष्ट्या योग्य होणार नाही असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यसभेत पुण्याचा किमान एक सदस्य असणे योग्य आहे. पक्षासाठीही ते चांगले होईल. त्यामुळे उमेदवार कोण ते पक्षाने ठरवावे, मात्र ६ रिक्त जागांपैकी किमान १ जागा पुणे शहराला द्यावी असे मत भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र लोकसभेची उमेदवारी पुण्यातून मिळावी यासाठीही ते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. राज्यसभेची जागा पुण्याला द्यायची की नाही याचा निर्णय केंद्रीय स्तरातूनच होणार असल्याने तिथेच जोर लावण्यात येत असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेत प्रतिनिधित्व असणे ही त्यात्या शहरासाठी गौरवाची गोष्ट असते. पुण्याला हा मान मिळावा या पदाधिकाऱ्यांच्या मतामध्ये काहीच गैर नाही. या जागांचा निर्णय पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेत असते. उमेदवार ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच असतो. त्यांच्यापर्यंत आम्ही ही मागणी पोहचवू. मागणी योग्य आहे असेच माझेही मत आहे.

- धीरज घाटे- शहराध्यक्ष, भाजप, पुणे

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा