शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव देणार

By admin | Updated: July 6, 2016 03:22 IST

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण केलेल्या स्वयम् या उपग्रहाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणेमधील (सीओईपी)

पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण केलेल्या स्वयम् या उपग्रहाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणेमधील (सीओईपी) विद्यार्थी व प्राध्यापकांना महापालिकेच्या वतीने खास भेट देण्यात आली. या महाविद्यालयाच्या शेजारीच असलेल्या उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव देण्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी केली.महापालिकेच्या वतीने सीओईपीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, सीओईपीचे डॉ. बी. बी. अहुजा या वेळी उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘सीओईपीसारख्या संस्थेला स्वायत्तता मिळणे अपेक्षित आहे. सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. उड्डाणपुलामुळे संस्थेला त्रास होणार असल्याने साऊंड बॅरिअर, अंडरपास आणि स्कायवॉकची मागणी होत आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत.’’ सीओईपीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काही निधी मिळावा, यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळामार्फत केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सुळे यांनी दिले. उड्डाणपुलासाठी जागा दिल्याबद्दल महापौरांनी सीओईपीचे आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी मदत म्हणून ३ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. (प्रतिनिधी)- खासदार सुळे यांनी संचेती चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला जगप्रसिद्ध अभियंते डॉ. सर विश्वेश्वरय्या यांचे नाव देण्याची सूचना केली. डॉ. माशेलकर यांनी त्यावर या उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव द्यावे, असे सुचविले. त्याला सभागृहात उपस्थित सर्वांनी त्वरित मान्यता दिली. त्यामुळे महापौरांनाही लगेचच ही सूचना मान्य करीत उड्डाणपुलाला सीओईपीचे नाव देत असल्याची घोषणा केली.या वेळी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘स्वयंमचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या निर्मितीमध्ये असंख्य घटकांचे मोठे योगदान आहे. गुणवत्ता व उपयुक्ततेचे हे आदर्श उदाहरण असून, अन्य संस्थांनीही त्याची दखल घ्यावी. अलीकडच्या काळातील देशाच्या प्रगतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे. भारतीय बुद्धिमत्ता कुठेही कमी पडणारी नाही, हे यातून सिद्ध होत आहे.’’