शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या; अन्यथा रिंगरोड रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST

पुणे : आधी खडकवासला धरण, नंतर एनडीएसाठी आणि आता रिंगरोडसाठी आमच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. आधीच अल्पभूधारक झालो ...

पुणे : आधी खडकवासला धरण, नंतर एनडीएसाठी आणि आता रिंगरोडसाठी आमच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. आधीच अल्पभूधारक झालो आहोत, रिंगरोडसाठी जमीन दिल्यास आम्ही भूमिहीन होणार आहे. आमचा ऐतिहासिक वारसा नष्ट करणार आहात का, आमच्या जमीन घेणार असाल चारपट पैसे नको, तर बदल्यात जमिनीच द्या, अन्यथा रिंगरोड रद्द करा, अशी मागणी मांडवी बुद्रुकच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

या शेतकऱ्यांमध्ये गोपाळ पायगुडे, दत्तात्रय पायगुडे, श्रीपती नाना पायगुडे, विलास पायगुडे, शंकर पायगुडे, चंद्रकांत लिमये, अक्षय पायगुडे, संतोष पायगुडे आणि गणेश पायगुडे आदींचा समावेश आहे.

मांडवी बुद्रुक गावात रिंगरोड हा राजकीय हेतूने वळवण्यात आला आला आहे. माजी खासदार आणि अभिनेत्याचे फार्महाऊस वाचवण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचा थेट आरोप रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे.

---

कोट

सन २०१६ च्या रिंगरोड आखणीनुसार मालखेडवरून मुठा नदीवर मोठा पूल बांधून सांगरूणमार्गे कातवडी, बहुलीमार्गे जात होता. मात्र, आता राजकीय हेतूने यात बदल केला आहे. मुळात ११० मीटरचा रोड सरळ रेषेत असावा लागतो. जड वाहतूक, कंटेनर ही वळणे अत्यंत धोकादायक असणार आहे. वडगावच्या पुलावर जसे वारंवार अपघात होत आहेत, तसे भविष्यात मांडवीत अपघात होण्याचा धोका आहे.

- गोपाळ रामचंद्र पायगुडे, शेतकरी

----

ऐतिहासिक वारसा नष्ट होणार?

मुठा खोऱ्यातील पायगुडे सरदार आणि मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर यांचा साडेतीनशे वर्षांचा शिवकालीन इतिहास आहे. या रिंगरोडमुळे तो पुसला जाण्याचा धोका आहे. खडकवासला धरण, एनडीएला दिलेल्या जमिनीमुळे आमच्याकडे आता अल्प जमिनी राहिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला समान भाव किंवा चारपट पैसेही नको, त्याऐवजी जमिनीच्या बदल्यात जमिनीच द्या, अन्यथा तत्काळ येथील रिंगरोड रद्द करा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

-----

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

* आम्ही आधीच अल्पभूधारक आहोत, आम्हाला चारपट पैसे नको, तर जमिनीच द्या.

* मराठा आरक्षण रद्द झाल्याने आमच्या वारसांना पुनर्वसन कायद्याखाली शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.

* सन २०१६ ची रिंगरोड आखणी बदलली आहे. त्याची चौकशी करावी. तसेच कायदेशीर कारवाई करून मांडवीतील रिंगरोड रद्द करावा.