शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज द्या - स्वाभिमानी शेतकरी संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:20 IST

केंद्र सरकारने साखरेचा केवळ साठा (बफर स्टॉक) करून साखर उद्योगासमोरील प्रश्न सुटणार नाही. सरकारने साखर कारखान्यांना २९०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे.

पुणे : केंद्र सरकारने साखरेचा केवळ साठा (बफर स्टॉक) करून साखर उद्योगासमोरील प्रश्न सुटणार नाही. सरकारने साखर कारखान्यांना २९०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच, शिल्लक असलेल्या साखरेचे मूल्यांकन २९०० रुपये मानून राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना कर्जाच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.केंद्र सरकारने साखरेची किंमत २९ रुपये प्रति किलो इतकी निश्चित केली आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने कारखान्यांच्या उर्वरित शिल्लक साखरसाठ्याचे २९०० रुपये दराने मूल्यांकन करून कारखान्यांना फरकाची अतिरिक्त रक्कम दिली पाहिजे. त्यामुळे ऊस उत्पादकांची थकबाकी देता येईल. देशभरात साखरेचा दर समान नसतो. तसेच उत्तर प्रदेशने राजस्थान आणि पूर्व भारतातील बाजारपेठ काबीज केल्याने राज्यातील साखर शिल्लक राहण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना बिनव्याजी कर्जरूपी मदत केली पाहिजे, असेही तेम्हणाले.साखरेच्या निर्यातीवर हवा भरआॅक्टोबर २०१८ अखेरीस देशात तब्बल १२० लाख टन साखर अतिरिक्त राहणार आहे. सरकारने ३० लाख टनांचा बफर स्टॉक करण्याची घोषणा केली आहे. तर पुढील हंगामात ३४० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. म्हणजेच शिल्लक साखरेचे प्रमाण २४० लाख टनांवर जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीवर अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे. गरीब राष्ट्रांना आर्थिक मदत न करता त्यांना साखर व दूध पावडर द्यावी, जेणेकरून देशातील अतिरिक्त उत्पादनाचा बोजा कमी होईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने