शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शहीद सैनिकांना देवाचे स्थान द्या - विक्रम गोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:19 IST

शहीद सैनिकांच्या वीरमातांचा सन्मान कार्यक्रम

पुणे : भारत देशाचे वीर जवान युद्धामध्ये धारातीर्थी पावले. त्यांच्या आठवणी श्रद्धेने लक्षात ठेवून सामान्य माणसाने याची दखल घ्यावी. आपण सकाळी उठल्यावर देवाला नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सैनिकांनाही नतमस्तक व्हावे. या वीर शहीदसैनिकांना देवाचे स्थान द्या, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

सैनिक मित्र परिवार आयोजित शहीद सैनिकांच्या वीरमातांचा सन्मान आणि भाऊबीज कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ माजी क्रीडापटू अरुण दातार, रोटरी क्लब पूना मिडटाऊन सचिव अलका मोतीवाले, सेवा मित्रमंडळ अध्यक्ष शिरीष मोहिते, नारद मंदिर माजी उपाध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, आदर्श मित्रमंडळ अध्यक्ष उदय जगताप उपस्थित होते. १९६५, १९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९८५ची नागालँड मोहीम, १९९९ चे कारगिल युद्ध अशा युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या १४ वीरमातांचा सन्मान सोहळा साजरा केला.गोखले म्हणाले की, सैनिकाला नमस्कार करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. समाजाने दोन व्यक्तींचा नेहमी आदर केला पाहिजे. पहिला म्हणजे सैनिक आणि दुसरा म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आपले पोट भरते तो शेतकरी. सैनिक हा रात्रंदिवस जागून, देशाचे रक्षण करीत असतो. त्याने दिलेल्या बलिदानाची आपण सर्वांनी जाण राखली पाहिजे. माझ्या कुटुंबात मुलगा, भाचे, जावई हे सर्व सैनिक या विषयाशी निगडित आहेत. त्यामुळे या वीर जवान लोकांबद्दल तूर्त अभिमान आहे. वीर मातांच्या पत्नी, मुले, पती युद्धांमध्ये शहीद झाले या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नये. देशाचे रक्षण करून त्यांनी बलिदान दिले याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. तुम्ही वीरमाता एकट्या नसून सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे.प्रत्येकाने दररोज एक रुपया द्यावामी सर्वांना आवाहन करतो की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने दररोज एक रुपया जरी या सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी दिला. तरी हे आर्थिक दृष्ट्या संपन्न राहतील.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेMartyrशहीदSoldierसैनिक