शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:47 IST

७,९२४ शाळा, २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, गतवर्षाच्या तुलनेत यात १.७१ टक्के घट झालेली आहे. त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीत देखील कोकण विभाग आणि मुलींनी बाजी मारली आहे. 

मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का (स्ट्राइक रेट) मुलांच्या तुलनेत ३.८३ टक्क्याने अधिक आहे. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर निकाल जाहीर केला. याप्रसंगी सचिव देविदास कुलाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

आकडे सांगतात 

१५,५८,०२० नोंदणी केलेले विद्यार्थी१५,४६,५७९ परीक्षा दिलेले१४,५५,४३३ उत्तीर्ण झालेले

खचू नका, लढत राहा...

अपेक्षित यश मिळाले नसेल, तर आशा सोडू नका, धीर सोडू नका. खचून तर अजिबात जाऊ नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. गुण कमी मिळाले म्हणून आयुष्य संपत नाही. गुण कमी घेऊनही भरारी घेणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यामुळे, खचू नका, लढत राहा....

दहावीत मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ३.८३ अधिक; राज्यात दहावीच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; कोकणची पुन्हा बाजी अन् नागपूर विभाग माघारला

सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई १०वी व १२वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात मुलींची कामगिरी सरस आहे. १२वीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरली आहे. दहावीत ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले यातही मुर्तीचे प्रमाण मुलांपेक्षा २ टक्के अधिक आहे.

दहावीत २३,७१,९३२ पैकी ९३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी हे प्रमाण २३.६० टक्के होते. यात मुलींचे प्रमाण २५ टक्के, मुलांचे प्रमाण ९२.६३ टक्के आहे.

बारावीत ८८.७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्यावर्षीच्या ८७.१८ टक्क्यांच्या प्रमाणात हे प्रमाण किंचित अधिक आहे. उत्तीर्ण मुर्तीचे प्रमाण २१.६४% तर मुलांचे प्रमाण ८५.७०% आहे.

दहावीत १.२९ लाख विद्यार्थ्यांना २० टक्क्यांवर गुण, ४५,५१६ जणांना २५ टक्क्यांवर गुण; बारावीत १.१६ लाख जणांना २० टक्क्यांहून अधिक गुण, २४ हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांवर गुण.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल