शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:47 IST

७,९२४ शाळा, २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, गतवर्षाच्या तुलनेत यात १.७१ टक्के घट झालेली आहे. त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीत देखील कोकण विभाग आणि मुलींनी बाजी मारली आहे. 

मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का (स्ट्राइक रेट) मुलांच्या तुलनेत ३.८३ टक्क्याने अधिक आहे. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर निकाल जाहीर केला. याप्रसंगी सचिव देविदास कुलाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

आकडे सांगतात 

१५,५८,०२० नोंदणी केलेले विद्यार्थी१५,४६,५७९ परीक्षा दिलेले१४,५५,४३३ उत्तीर्ण झालेले

खचू नका, लढत राहा...

अपेक्षित यश मिळाले नसेल, तर आशा सोडू नका, धीर सोडू नका. खचून तर अजिबात जाऊ नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. गुण कमी मिळाले म्हणून आयुष्य संपत नाही. गुण कमी घेऊनही भरारी घेणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यामुळे, खचू नका, लढत राहा....

दहावीत मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ३.८३ अधिक; राज्यात दहावीच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; कोकणची पुन्हा बाजी अन् नागपूर विभाग माघारला

सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई १०वी व १२वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात मुलींची कामगिरी सरस आहे. १२वीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरली आहे. दहावीत ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले यातही मुर्तीचे प्रमाण मुलांपेक्षा २ टक्के अधिक आहे.

दहावीत २३,७१,९३२ पैकी ९३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी हे प्रमाण २३.६० टक्के होते. यात मुलींचे प्रमाण २५ टक्के, मुलांचे प्रमाण ९२.६३ टक्के आहे.

बारावीत ८८.७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्यावर्षीच्या ८७.१८ टक्क्यांच्या प्रमाणात हे प्रमाण किंचित अधिक आहे. उत्तीर्ण मुर्तीचे प्रमाण २१.६४% तर मुलांचे प्रमाण ८५.७०% आहे.

दहावीत १.२९ लाख विद्यार्थ्यांना २० टक्क्यांवर गुण, ४५,५१६ जणांना २५ टक्क्यांवर गुण; बारावीत १.१६ लाख जणांना २० टक्क्यांहून अधिक गुण, २४ हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांवर गुण.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल