शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:47 IST

७,९२४ शाळा, २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, गतवर्षाच्या तुलनेत यात १.७१ टक्के घट झालेली आहे. त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीत देखील कोकण विभाग आणि मुलींनी बाजी मारली आहे. 

मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का (स्ट्राइक रेट) मुलांच्या तुलनेत ३.८३ टक्क्याने अधिक आहे. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर निकाल जाहीर केला. याप्रसंगी सचिव देविदास कुलाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

आकडे सांगतात 

१५,५८,०२० नोंदणी केलेले विद्यार्थी१५,४६,५७९ परीक्षा दिलेले१४,५५,४३३ उत्तीर्ण झालेले

खचू नका, लढत राहा...

अपेक्षित यश मिळाले नसेल, तर आशा सोडू नका, धीर सोडू नका. खचून तर अजिबात जाऊ नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. गुण कमी मिळाले म्हणून आयुष्य संपत नाही. गुण कमी घेऊनही भरारी घेणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यामुळे, खचू नका, लढत राहा....

दहावीत मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ३.८३ अधिक; राज्यात दहावीच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; कोकणची पुन्हा बाजी अन् नागपूर विभाग माघारला

सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई १०वी व १२वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात मुलींची कामगिरी सरस आहे. १२वीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरली आहे. दहावीत ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले यातही मुर्तीचे प्रमाण मुलांपेक्षा २ टक्के अधिक आहे.

दहावीत २३,७१,९३२ पैकी ९३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी हे प्रमाण २३.६० टक्के होते. यात मुलींचे प्रमाण २५ टक्के, मुलांचे प्रमाण ९२.६३ टक्के आहे.

बारावीत ८८.७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्यावर्षीच्या ८७.१८ टक्क्यांच्या प्रमाणात हे प्रमाण किंचित अधिक आहे. उत्तीर्ण मुर्तीचे प्रमाण २१.६४% तर मुलांचे प्रमाण ८५.७०% आहे.

दहावीत १.२९ लाख विद्यार्थ्यांना २० टक्क्यांवर गुण, ४५,५१६ जणांना २५ टक्क्यांवर गुण; बारावीत १.१६ लाख जणांना २० टक्क्यांहून अधिक गुण, २४ हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांवर गुण.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल