शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नव्या युगाचे साहित्य लिहिण्यास करा सुरुवात - गेल आॅम्व्हेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:38 IST

साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे.

पुणे : साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे. नव्या युगाचे साहित्य लिहिण्यास आपण सुरुवात करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखिका गेल आॅम्व्हेट यांनी व्यक्त केली.दलित युवक आंदोलन प्रणीत सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन २०१९ चे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका गेल आॅम्व्हेट आणि पत्रकार प्रतिमा जोशी मुंबई यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या.संमेलनात स्वागताध्यक्ष मुक्ताई प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत घोडे, दलित युवक आंदोलन संस्थापक अध्यक्ष, सचिन बगाडे, अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे सोपान खुडे, सरू वाघमारे, भारत पाटणकर, प्रज्ञा कांबळे, प्रकाश सोनवणे, जोशीला लोमटे आदी उपस्थित होते. गुलामगिरीच्या बेड्या तोडून दुसऱ्या मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.आॅम्व्हेट म्हणाल्या, आजचे साहित्य दोन प्रकारचे आहे. एक प्रकार सरळ प्रस्थापित साहित्याचा आहे. दुसरा प्रकार जग बदलण्याची स्वप्ने पाहणारा, जनांच्या जीवनातील नवनिर्मितीचा, आणि सुंदरतेच्या बाबतीत साहित्य निर्माण करणारा आहे. साहित्य लिखाणात आनंदाचे प्रसंग, दु:ख संपवण्याची जिद्द, नवे जीवन मिळवण्याचा संघर्ष असायला पाहिजे.माणूस म्हणून जगणं विसरलोय...१ प्रतिमा जोशी म्हणाल्या, साहित्याचा दर्द आपण दु:ख या अर्थाने घेतो. साहित्यिक आपल्या भावनेतून कला व्यक्त करत असतो. सर्वश्रेष्ठ विनोदाला कारुण्याची उमेद असते. हे सर्व कलेचे पैलू आहेत. शिक्षणाने माणसे शहाणी होतात; परंतु आजच्या परिस्थितीत आपण माणूस म्हणून जगणे विसरलो आहे.२ काव्याला साहित्य, संस्कृतीत फारच महत्त्व असते. काव्य हे माणसाच्या हृदयातून यावे लागते. त्यासाठी आजूबाजूच्या माणूस आणि सृष्टीविषयी प्रेम असणे गरजेचे आहे. साहित्य हे रोजच्या जगण्यापेक्षा वेगळे नसते. तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवते.घोडे म्हणाले, महिलांना महात्मा फुले यांनी शिक्षण देऊन इतिहास घडवला. ज्या देशात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, तो देश इतिहासात प्रगतशील आहे. समाजात मुलींना शिक्षण, महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास प्रवृत्त केले तर भारत देशाला महासत्ता होण्यास कोणीही रोखू शकणार नाही.खुडे म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला. पण या शिक्षणाचा सद्यस्थितीत फायदा होत आहे का, सर्वांनी याचा विचार करायला हवा. आईवडिलांचा आदर करा. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करा. साहित्य संमेलनातून हे विचार मांडणार आहोत. 

टॅग्स :Puneपुणे