शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

मंडपांसाठी परवानगी घ्या!

By admin | Updated: September 14, 2015 04:50 IST

गणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

दीपक जाधव, पुणेगणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांतील आकडेवारीनुसार वर्षाला केवळ ८५ ते ९० मंडळांकडून परवानगी घेतली जात असल्याचे माहिती अधिकारामध्ये उजेडात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याने मंडळांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.उत्सवाच्या काळांमध्ये रस्त्यावर बेकायदेशीरपणे व नियमांचे पालन न करता उभारल्या जाणाऱ्या मंडपांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने मंडप उभारण्याबाबत काटेकोर नियमावली ठरवून देण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. पुणे महापालिकांकडून त्यानुसार नियमावली तयार करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तोपर्यंत यंदा गणेश मंडळांना जुन्या नियमावलीनुसार परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, जुन्या नियमावलीनुसार मंडपांसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगीच घेतली जात नसल्याचे उजेडात आले आहे. शहरामध्ये शेकडो गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मंडळे आहेत. त्याचबरोबर ईद, दहीहंडी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमांसाठी रस्त्यावरच मंडप उभारले जातात. मात्र, त्यातील बहुतांश मंडळे परवानगीच घेतली जात नसल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. रस्त्यांवर मंडप टाकण्यासाठी २००९ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीमध्ये किती जणांनी परवानगी घेतली याची माहिती लोकहित फाऊंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी मागितली होती. त्यामध्ये गेल्या ७ वर्षांत केवळ ४८० जणांनी मंडप टाकण्यासाठी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. २००१ मध्ये ९०, २०१२ मध्ये ६०, २०१३ मध्ये ८०, २०१४ मध्ये ८८, २०१५ (आॅगस्टपर्यंत) ४७ मंडळे, संस्थांनी परवानगी घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. उच्च न्यायालयाने रस्त्याच्या किमान एक तृतीयांश जागेवरच मंडप उभारण्यात यावा, आठ फूट किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप उभारू नयेत, मंडप उभारताना वाहतूक विभाग, पोलीस ठाणे, अग्निशमन विभाग यांची परवानगी घ्यावी, महावितरणकडून रीतसर परवानगी घेऊनच वीजजोड घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.