शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या: समाजाचा प्रवास अविचारी झुंडीकडे, विविध मान्यवरांचा सूर : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:33 IST

गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे?

पुणे : गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे? आपला प्रवास समाजाकडून झुंडीकडे होत आहे का? असे अनेक प्रश्न मान्यवरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर उपस्थित केले.ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे आणि नीलिमा गुंडी या वेळी उपस्थित होत्या. संपादक विजय बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. मनोहर जाधव म्हमाले, लोकशाही व्यवस्थेने प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विचारांचा संघर्ष विचारांनी व्हायला हवा. मात्र, प्रागतिक विचारांचे, विवेकवादी लोक समाजाला शहाणे करण्यासाठी झटत असतात. मात्र, आता त्यांनाच प्राण गमवावे लागत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर येणाºया उन्मादी प्रतिक्रिया आपल्या संस्कृतीला शोभणाºया नाहीत. समाजाची वैचारिक वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, असा प्रश्न पडतो. बोलण्यावर, लिहिण्यावर निर्बंध आणून निर्माण केला जाणारा दहशतवाद मानवी मूल्यांसाठी घातक आहे.‘गौरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर तासाभरात त्यांच्या आर्थिक हितसंबंधांसंदर्भात काही व्यक्तींनी व्यक्त व्हायला सुरुवात करणे आश्वर्यकारक होते. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होणेही धोक्याचे बनले आहे. ‘माणूस गेला तरी विचार संपत नाहीत’ असे म्हणणे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे आहे. या घटनांचा सर्वस्वी दोष राज्य व केंद्रातील गृहमंत्र्यांचा आहे. ते निष्क्रिय आहेत, तोवर कोणालाही शांतपणे जगता येणार नाही, असेही ते म्हणाले.डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘समाजात विशिष्ट प्रकारचा उन्माद पाहायला मिळत आहे. वैचारिक दृष्ट्या परिपक्व अशी महाराष्ट्राची विचारवंतांनी तयार केलेली प्रतिमा मलिन होत चालली आहे, हे आपले दुर्दैव. वैचारिक समाजाकडून आपला प्रवास मूल्यहीन, नीतिमत्ताशून्य समूहाकडे, झुंडीकडे होतो आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणPuneपुणे