शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गौरी लंकेश हत्या: समाजाचा प्रवास अविचारी झुंडीकडे, विविध मान्यवरांचा सूर : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:33 IST

गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे?

पुणे : गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे? आपला प्रवास समाजाकडून झुंडीकडे होत आहे का? असे अनेक प्रश्न मान्यवरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर उपस्थित केले.ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे आणि नीलिमा गुंडी या वेळी उपस्थित होत्या. संपादक विजय बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. मनोहर जाधव म्हमाले, लोकशाही व्यवस्थेने प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विचारांचा संघर्ष विचारांनी व्हायला हवा. मात्र, प्रागतिक विचारांचे, विवेकवादी लोक समाजाला शहाणे करण्यासाठी झटत असतात. मात्र, आता त्यांनाच प्राण गमवावे लागत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर येणाºया उन्मादी प्रतिक्रिया आपल्या संस्कृतीला शोभणाºया नाहीत. समाजाची वैचारिक वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, असा प्रश्न पडतो. बोलण्यावर, लिहिण्यावर निर्बंध आणून निर्माण केला जाणारा दहशतवाद मानवी मूल्यांसाठी घातक आहे.‘गौरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर तासाभरात त्यांच्या आर्थिक हितसंबंधांसंदर्भात काही व्यक्तींनी व्यक्त व्हायला सुरुवात करणे आश्वर्यकारक होते. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होणेही धोक्याचे बनले आहे. ‘माणूस गेला तरी विचार संपत नाहीत’ असे म्हणणे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे आहे. या घटनांचा सर्वस्वी दोष राज्य व केंद्रातील गृहमंत्र्यांचा आहे. ते निष्क्रिय आहेत, तोवर कोणालाही शांतपणे जगता येणार नाही, असेही ते म्हणाले.डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘समाजात विशिष्ट प्रकारचा उन्माद पाहायला मिळत आहे. वैचारिक दृष्ट्या परिपक्व अशी महाराष्ट्राची विचारवंतांनी तयार केलेली प्रतिमा मलिन होत चालली आहे, हे आपले दुर्दैव. वैचारिक समाजाकडून आपला प्रवास मूल्यहीन, नीतिमत्ताशून्य समूहाकडे, झुंडीकडे होतो आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणPuneपुणे