शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वीस वर्षे पैसे न घेता केले ‘घाशीराम कोतवाल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:09 IST

‘लोकमत’च्या वाचकांसाठी अर्धशतकाची वाटचाल थेट ‘नाना फडणवीस’ यांच्या शब्दात 

- डॉ. मोहन आगाशे, पुणे  पन्नास वर्षे मागे वळून पाहताना ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाने आम्हाला काय दिले. यापेक्षाही लोकांना आनंद देण्याची आम्हाला संधी मिळाली हे अधिक महत्त्वाचे आहे. या नाटकाने कुणी कलाकारांनी बंगले बांधले नाहीत. सर्व कलाकारांंनी तब्बल वीस वर्षे हे नाटक कोणतेही पैसे न घेता केले. हे विशेष! 

’घाशीराम कोतवाल’मधील ‘नाना फडणवीस हा शक्तीशाली व्यक्तीचे तर ‘घाशीराम’ हा सामान्य व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत होता. सत्ताधीश स्वत:च्या फायद्यासाठी व्यक्तींचा कसा वापर करून घेतात हे दाखविले आहे. एक प्रसंग आजही आठवतोय. मी ससूनमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होतो. नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाल्यानंतर चारच दिवसांत मेहुणे ससूनच्या माझ्या निवासस्थानी आले. माझ्या वडिलांना कोणीतरी फोन करून सांगितले होते की आगाशे यांना सरदार कर्तारसिंह थत्ते नावाचा गृहस्थ मारणार आहे. त्यामुळे वडिलांनी काळजीपोटी त्यांना पाठविले होते. तेवढयात सरदारसारखे गृहस्थ हातावर छडी मारत ‘आगाशे कोणं’ म्हणत आले. ‘नाना’ ची भूमिका तुम्ही करू नका, असे ते म्हणाले. मी तुमच्या मतांचा आदर करतो. हे नाटक आहे आणि कुणी स्वतंत्र विचार केला तर त्याला ते करू द्यावे. माझ्या काही वक्तव्याचा राग येऊन त्यांनी माझ्यावर काठी उगारली. 

पोलिसांनी ती अडवली. त्याला उचलून व्हॅनमध्ये नेले. माझ्याबरोबरचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मध्ये पडले. त्यांनी कर्तारसिंह थत्ते यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला, अशी तक्रार दिली परत ते भेटले तेव्हा आता तुम्हाला मारणार नाही. मला निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे असे सांगून निघून गेले.

’घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले. १६ डिसेंबर १९७२ रोजी विजय तेंडुलकरलिखित व जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. या नाटकाला शु्क्रवारी (दि. १६) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मूळ नाटकात डॉ. मोहन आगाशे यांनी ‘नाना फडणवीस’ यांची अजरामर भूमिका साकारली होती.