शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

वीस वर्षे पैसे न घेता केले ‘घाशीराम कोतवाल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:09 IST

‘लोकमत’च्या वाचकांसाठी अर्धशतकाची वाटचाल थेट ‘नाना फडणवीस’ यांच्या शब्दात 

- डॉ. मोहन आगाशे, पुणे  पन्नास वर्षे मागे वळून पाहताना ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाने आम्हाला काय दिले. यापेक्षाही लोकांना आनंद देण्याची आम्हाला संधी मिळाली हे अधिक महत्त्वाचे आहे. या नाटकाने कुणी कलाकारांनी बंगले बांधले नाहीत. सर्व कलाकारांंनी तब्बल वीस वर्षे हे नाटक कोणतेही पैसे न घेता केले. हे विशेष! 

’घाशीराम कोतवाल’मधील ‘नाना फडणवीस हा शक्तीशाली व्यक्तीचे तर ‘घाशीराम’ हा सामान्य व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत होता. सत्ताधीश स्वत:च्या फायद्यासाठी व्यक्तींचा कसा वापर करून घेतात हे दाखविले आहे. एक प्रसंग आजही आठवतोय. मी ससूनमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होतो. नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाल्यानंतर चारच दिवसांत मेहुणे ससूनच्या माझ्या निवासस्थानी आले. माझ्या वडिलांना कोणीतरी फोन करून सांगितले होते की आगाशे यांना सरदार कर्तारसिंह थत्ते नावाचा गृहस्थ मारणार आहे. त्यामुळे वडिलांनी काळजीपोटी त्यांना पाठविले होते. तेवढयात सरदारसारखे गृहस्थ हातावर छडी मारत ‘आगाशे कोणं’ म्हणत आले. ‘नाना’ ची भूमिका तुम्ही करू नका, असे ते म्हणाले. मी तुमच्या मतांचा आदर करतो. हे नाटक आहे आणि कुणी स्वतंत्र विचार केला तर त्याला ते करू द्यावे. माझ्या काही वक्तव्याचा राग येऊन त्यांनी माझ्यावर काठी उगारली. 

पोलिसांनी ती अडवली. त्याला उचलून व्हॅनमध्ये नेले. माझ्याबरोबरचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मध्ये पडले. त्यांनी कर्तारसिंह थत्ते यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला, अशी तक्रार दिली परत ते भेटले तेव्हा आता तुम्हाला मारणार नाही. मला निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे असे सांगून निघून गेले.

’घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले. १६ डिसेंबर १९७२ रोजी विजय तेंडुलकरलिखित व जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. या नाटकाला शु्क्रवारी (दि. १६) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मूळ नाटकात डॉ. मोहन आगाशे यांनी ‘नाना फडणवीस’ यांची अजरामर भूमिका साकारली होती.