शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

वीस वर्षे पैसे न घेता केले ‘घाशीराम कोतवाल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:09 IST

‘लोकमत’च्या वाचकांसाठी अर्धशतकाची वाटचाल थेट ‘नाना फडणवीस’ यांच्या शब्दात 

- डॉ. मोहन आगाशे, पुणे  पन्नास वर्षे मागे वळून पाहताना ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाने आम्हाला काय दिले. यापेक्षाही लोकांना आनंद देण्याची आम्हाला संधी मिळाली हे अधिक महत्त्वाचे आहे. या नाटकाने कुणी कलाकारांनी बंगले बांधले नाहीत. सर्व कलाकारांंनी तब्बल वीस वर्षे हे नाटक कोणतेही पैसे न घेता केले. हे विशेष! 

’घाशीराम कोतवाल’मधील ‘नाना फडणवीस हा शक्तीशाली व्यक्तीचे तर ‘घाशीराम’ हा सामान्य व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत होता. सत्ताधीश स्वत:च्या फायद्यासाठी व्यक्तींचा कसा वापर करून घेतात हे दाखविले आहे. एक प्रसंग आजही आठवतोय. मी ससूनमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होतो. नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाल्यानंतर चारच दिवसांत मेहुणे ससूनच्या माझ्या निवासस्थानी आले. माझ्या वडिलांना कोणीतरी फोन करून सांगितले होते की आगाशे यांना सरदार कर्तारसिंह थत्ते नावाचा गृहस्थ मारणार आहे. त्यामुळे वडिलांनी काळजीपोटी त्यांना पाठविले होते. तेवढयात सरदारसारखे गृहस्थ हातावर छडी मारत ‘आगाशे कोणं’ म्हणत आले. ‘नाना’ ची भूमिका तुम्ही करू नका, असे ते म्हणाले. मी तुमच्या मतांचा आदर करतो. हे नाटक आहे आणि कुणी स्वतंत्र विचार केला तर त्याला ते करू द्यावे. माझ्या काही वक्तव्याचा राग येऊन त्यांनी माझ्यावर काठी उगारली. 

पोलिसांनी ती अडवली. त्याला उचलून व्हॅनमध्ये नेले. माझ्याबरोबरचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मध्ये पडले. त्यांनी कर्तारसिंह थत्ते यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला, अशी तक्रार दिली परत ते भेटले तेव्हा आता तुम्हाला मारणार नाही. मला निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे असे सांगून निघून गेले.

’घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले. १६ डिसेंबर १९७२ रोजी विजय तेंडुलकरलिखित व जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. या नाटकाला शु्क्रवारी (दि. १६) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मूळ नाटकात डॉ. मोहन आगाशे यांनी ‘नाना फडणवीस’ यांची अजरामर भूमिका साकारली होती.