शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कचरा साचला, आरोग्य धोक्यात!

By admin | Updated: January 8, 2015 01:08 IST

शहरामध्ये साचत चाललेल्या कचऱ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : शहरामध्ये साचत चाललेल्या कचऱ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साचलेला कचरा कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकणे बंद झाल्याने शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. १ जानेवारी रोजी शहरात साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर पर्यायी मार्ग वापरले जात आहेत. मात्र, दररोजचा १,५०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे. याबाबत डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले, ‘‘कचरा कुजल्यामुळे सर्वांत पहिल्यांदा प्रदूषित वायू तयार होऊन दुर्गंधी पसरण्यास सुरुवात होते. या वायूमुळे श्वासाचे त्रास होऊ शकतात. त्यानंतर कचऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू तयार व्हायला सुरुवात होते, तसेच माशा वाढतात. त्यातून अतिसार, टायफॉइड, मलेरिया यासारखे रोग मोठ्या प्रमाणात फैलावण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत जर पाऊस पडला, तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते.’’ (प्रतिनिधी)कचरा साचलेल्या कंटेनरच्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुरूवारपासून जंतुनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे ७५ कर्मचारी या कामासाठी नेमण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांनीही योग्य ती दक्षता घ्यावी, बाहेरचे खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे.- एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख४शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे ओला कचरा वेगळा होऊन त्याची विल्हेवाट लावणे सोपे जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचरा वर्गीकरण करण्यासाठी घनकचरा विभागातील १,६०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना दिवस-दिवसभर कचऱ्यात बसावे लागते. कचऱ्यात येत असलेल्या सुया, सॅनिटरी नॅपकीन, वैद्यकीय कचरा यांच्या हाताळणीमुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.