शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याही बाप्पाला पाहू द्या ना, मिरवणुकीचा विलंब टाळा

By अतुल चिंचली | Updated: July 29, 2022 14:20 IST

लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश मंडळांची मागणी....

पुणे : आमच्या बाप्पालाही नागरिकांनी पाहावे अशी आमची इच्छा असते. प्रतिष्ठित मंडळांप्रमाणे आमच्या मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन थाटात व्हावे, असे वाटते. परंतु विसर्जन मिरवणुकीला होणाऱ्या विलंबामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह निघून जातो. अनंत चतुर्दशीला आम्हाला सहा ते सात तास एकाच जागी ताटकळत उभे राहावे लागते. विसर्जनाला विलंब न होता वेळेत बाप्पाला निरोप देता येईल, असे नियोजन करायला हवे, अशी मागणी लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश मंडळांनी केली आहे.

विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी, टिळक, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरून मंडळे थाटात बाप्पाला निरोप देतात. अनंत चतुर्दशीला मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सकाळी दहा वाजता टिळक पुतळ्याजवळ आगमन होते. त्यानंतर पुण्यातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मानाचे गणपती, महोत्सवी वर्षात पदार्पण केलेली मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकातून मार्गस्थ झाल्यावर पुढील मंडळांना क्रमांकानुसार सोडले जाते. सकाळी मिरवणूक सुरू झाल्यावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत फक्त मानाचे पाच गणपती समाधान चौकातून जातात. त्यानंतर पुढच्या सात ते आठ तासात १५० ते २०० च्या आसपास मंडळे समाधान चौकातून जातात. त्या दोनशे मंडळांनी पुढील सात तासच मिरवणुकीचा आनंद कसा घ्यायचा, असा सवाल मंडळांनी उपस्थित केला आहे.

मानाच्या गणपती मंडळांनी दुपारी १२ च्या आत समाधान चौक पास करायला हवा. म्हणजे लक्ष्मी रस्त्यावरील लाईन लवकर सुरू होईल. तसेच इतर मंडळांचे गणपती, देखावेसुद्धा नागरिक पाहू शकतील आणि वेळेत मंडळांचे विसर्जन होईल.

- राकेश डाखवे, जनार्दन पवळे संघ

मानाच्या गणपतींचा थाट खूपच असतो. त्यांच्या मिरवणुकीत दोन-तीन ढोल पथके, लेझीम असतात. ते प्रत्येक जण समाधान चौकात येऊन आपला खेळ दाखवतात. त्यामुळे पाचही गणपती समाधान चौकातून पुढे मार्गस्थ होण्यास वेळ जातो. त्याचा परिणाम पूर्ण विसर्जन मिरवणुकीवर होतो.

- भाऊ करपे, सहकार तरुण मंडळ

आमची मिरवणूक सायंकाळी सुरू होते. पण लक्ष्मी रस्त्यावर आलो की आम्हाला तासनतास ताटकळत थांबावे लागते. त्यातून रात्री १२ नंतर स्पीकर बंद करावे लागतात. पण रात्रीचे १२ वाजून गेले तरी आमचे मंडळ समाधान चौकात येत नाही. त्यानंतर आम्हाला शांततेत गणपतीला अलका चौकापर्यंत घेऊन जावे लागते.

- विलास ढमाले, गणेशपेठ पांगुळ अळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

२०१९ मध्ये लक्ष्मी रस्त्यावर आमच्या रथाचा नंबर १५० होता. मिरवणूक सुरू झाल्यावर आमचे मंडळ एकाच जागी ८ तास थांबले होते. पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी जाता येत नव्हते. आम्ही समाधान चौक पास केल्यावर १५ मिनिटात अलका चौकात पोहोचलो. कार्यकर्तेही कंटाळून निघून गेले होते. जर आम्हाला सकाळी ८ वाजता विसर्जनाची परवानगी दिली. तर आम्ही स्वखुशीने सकाळी मिरवणूक काढू

- प्रीतम शिंदे, हिंद माता तरुण मंडळ

विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आम्हाला घेता येत नाही. सायंकाळी ७ ला निघालेली मिरवणूक रात्री १२ पर्यंत समाधान चौकात येत नाही. एकाच ठिकाणी ताटकळत राहिल्यास कार्यकर्तेही घरी निघून जातात. सगळ्या मंडळांना विचारात घेऊन विसर्जन मिरवणुकीचे योग्य ते नियोजन करावे, अशी आमच्यासारख्या मंडळांची मागणी आहे.

- सागर शेलार, अशोक तरुण मंडळ

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव