शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

गायतोंडें यांच्या पेंटिंगच्या विक्रमामुळे ‘आर्ट्स इन्व्हेस्टमेंट’ला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:10 IST

--वासुदेव गायतोंडे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी केलेले पेंटिंग आज तब्बल ३९ कोटी रुपयांना विकले गेले. ४० वर्षांपूर्वी हे पेेंटिंग ...

--वासुदेव गायतोंडे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी केलेले पेंटिंग आज तब्बल ३९ कोटी रुपयांना विकले गेले. ४० वर्षांपूर्वी हे पेेंटिंग ज्यांनी खरेदी केले त्यांना आज त्याच चित्राने लाखो पटीने फायदा मिळवून दिला. या घटनेमुळे ‘आर्ट्स इन्व्हेस्टमेंट’चे महत्त्व भारतीय समाजात चांगला रुजेल व लोक आता पेंटिंगमध्ये इन्व्हेस्ट करण्याला प्राधान्य देतील, अशी आशा ज्येष्ठ चित्रकार सिद्धार्थ नाईक यांनी व्यक्त केली.

पद्मश्री पुरस्कार विजेते दिवंगत वासुदेव गायतोंडे यांचे एक चित्र तब्बल ३९ कोटी ९८ लाख (५५ लाख अमेरिकन डॉलर) रुपयांना विकले गेले. भारतीय चित्रकलेच्या विश्वात एका पेंटिंगला मिळालेली ही आजपर्यंत सर्वात मोठी किंमत आहे त्यामुळे पेंटिंग विश्वात सध्या याची चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ चित्रकार सिद्धार्थ नाईक यांच्याशी पेंटिंगबद्दल साधलेला हा संवाद.

नाईक म्हणाले की, गायतोंडे यांच्या ४० वर्षांपूर्वी काढलेल्या या चित्राला मिळालेली किंमत ही भारतीय बाजारामध्ये एक माइलस्टोन आहे, हे खरे आहे. तरीही जागतिक बाजाराचा विचार करता ही किंमत नॉर्मल आहे. कारण लिओनार्दो द विंची यांच्या चित्राला काही वर्षांपूर्वी तब्बल ४५० लाख अमेरिकन डॉलर अर्थात २,९४० करोड रुपयांमध्ये विकले गेले आहे. मात्र गायतोंडे यांच्या चित्राच्या विक्रमामुळे तसा दृष्टिकोन भारतीय बाजारात येत आहे याचा निश्चित आनंद चित्रकारांच्या जगात आहे.

गायतोंडे यांनी १९६१ साली हे चित्र तयार केले होते आणि १९६२ मध्ये आदिती व आदित्य मंगलदास यांनी हे चित्र त्यांच्याकडून खरेदी केले होते. सुमारे ४० वर्षे त्यांच्या घरामध्ये त्यांनी या पेंटिंगच्या सायलेंट फिलचा आनंद घेतला व पुन्हा त्यांनी या चित्राचा लिलाव केला तेव्हा त्यांना तब्बल ३९.९८ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे चांगली पेंटिंग तुम्हाला वर्षानुवर्षे उत्तम आनंद देतेच व हजारो पटीने त्याची किंमत वाढलेली असते त्यामुळे कोणत्याही औदासिन्य मूल्यांच्या (डिप्रीशिअन व्हॅल्यू) वस्तू खरेदी करण्यापेक्षा उत्तम पेंटिंग खरेदी करणे किती लाभदायक असते हेच यावरून सिद्ध होते.

गायतोंडे यांनी काढलेले या चित्रामध्ये समुद्राचा रंग आहे व एक लाल ठिपका आहे. याचा नेमका अर्थ काय असे अनेक जण विचारात, मात्र चित्राचा अर्थ हा ते चित्र पाहणाऱ्या रसिकाच्या अभिरुचीप्रमाणेच भिन्न असते. त्यामुळे त्याचा अमुक एकच अर्थ असेल असे सांगणे चुकीचे ठरेल. मात्र चित्रकाराने त्याचा जीव त्या चित्रात ओतला की चित्र अप्रतिम होते व पाहणाऱ्याला ते भावते. त्यामुळे नव्या चित्रकारांना आम्ही हेच सांगत असतो की, चित्र काढताना तुम्ही स्वत:ची कल्पना त्यात मांडा, जीव ओतून ते रेखाटा. समुद्राचा निळा रंग आणि त्यावर लाल ठिपका दिला की गायतोंडे यांनी काढलेल्या चित्रासारखे चित्र प्रत्येकाला काढता येईल मात्र त्याला तितकी किंमत मिळणार नाही जितकी गायतोंडे यांच्या चित्राला मिळाली. त्यामुळे तुमच्या चित्रामध्ये तुमची प्रतिभा दिसणे महत्त्वाचे आहे.

---

चौकट

माणसांची व घराची ओळख निर्माण करण्याची चित्रामध्ये ताकत

--

चित्रांमध्ये प्रचंड ताकत असते. तुमच्या घराची किंवा तुमची ओळख निर्माण करण्याचे काम तुमच्या घरात लावलेले चित्र करत असतात. एखाद्या घरामध्ये कशा प्रकारचे चित्र लावले आहे ते पाहून चित्र पाहणारे त्या घराविषयी व घरातील माणसांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा समज तयार करत असतात. त्यामुळे घरात, कार्यालयात, हॉटेल व दुकानात तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करणारे चित्र लावले पाहिजे, असे मत सिद्धार्थ नाईक यांनी सांगितले.

--