शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवीन पिढीपर्यंत गडकरी पोहोचावेत : श्रीराम रानडे; राम गणेश गडकरींच्या नाटकांचे अभिवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:11 IST

नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देराम गणेश गडकरी यांच्या आठवणींना देण्यात आला उजाळादारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकरींची नाटके सदाहरित : रानडे

पुणे : नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विजय गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' अशी नाटके लिहिणारे राम गणेश गडकरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या नाटकांचे अभिवाचन विजय कुलकर्णी, श्रीराम रानडे यांनी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात केले.या वेळी रानडे म्हणाले, ‘‘साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर समजले जाते. गडकरी यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकरी यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकरींची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्यांच्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.’’

विनोदी लिखाण करणाऱ्या लेखकाची ही दवा आपल्याला आमंत्रण करणारी पाहिजे. विनोद ही गडकऱ्यांच्या लेखणीची शाई होती. गडकरी यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

- विजय कुलकर्णी  

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशी