शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पुणे-सातारा रस्त्यावरील टोलमुक्तीची गडकरींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या रस्त्यावरील अपूर्ण कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांच्या अभ्यासाचे काम एक संस्था करत असून, लवकरच अहवाल सादर होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गांवरील विविध रस्ते व पुलांच्या १३४ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण शुक्रवारी (दि. २४) गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी टोलमुक्तीची महत्त्वाची घोषणा केली. या मागणीसाठी विविध संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत होत्या. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डाॅ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

चौकट

पुणे-बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा

“पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी एक पुणे-बंगळुरु महामार्ग आहे. या महामार्गावर ‘ग्रीन हायवे ऍक्सीस कंट्रोल’ बांधला जात आहे. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्यातली गर्दी, वाहतूक कोंडी कमी होईल,” असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. या महामार्गाचे सादरीकरण लवकरच महाराष्ट्र सरकारला देऊन कामाला सुरुवात करू, असे ते म्हणाले.

चौकट

पुण्यातली गर्दी ‘अशी’ वळवणार

“आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये उत्तरेतील पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथून जाणारी वाहतूक मुंबईतून जाते. ही वाहतूक सुरतलाच थांबवण्याचे ठरवतो आहे. सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल ते चेन्नई असा १२७० किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधला जाणार आहे. यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे मुंबई-पुण्यातली वाहतुकीची गर्दी कमी होईल. शिवाय सध्याचा सोळाशे किलोमीटरचा महामार्ग १२७० किलोमीटरचा होईल. यामुळे दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.