शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

अकरावीचे आजपासून प्रवेश, १३ जून ते ४ आॅगस्टपर्यंत प्रक्रिया  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:47 IST

केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे.

पुणे - केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै २०१८ रोजी जाहीर करण्यात येईल,तर चौथ्या फेरीची शेवटची गुणवत्ता यादी २९ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध होईल.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळअखेरपर्यंत ६९ हजार ४२५ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अर्जाचा पहिला भाग भरला होता.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दुसºया भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरायचा आहे.बुधवारपासून या अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. अर्जाचे भाग १ व भाग २ भरून ते आॅनलाईन जमा करण्यासाठी २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावी अर्जाचा पहिला भागभरला नाही, त्यांना तो आता भरण्याचीही सुविधा २५ जूनपर्यंत उपलब्ध असेल.विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आॅनलाईन प्रसिद्ध केली जाईल. या यादीमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास अथवा चूक झाली असल्यास विद्यार्थ्यांना त्यावर ३० जून ते २ जुलै २०१८ पर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये लेखी हरकती नोंदविता येणार आहेत. या हरकतींची ३ जुलै रोजी छाननी करून निवारण केले जाईल.त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै २०१८ रोजी जाहीर केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ६ ते ९ जुलै २०१८ दरम्यान महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचाआहे. त्यानंतर १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.दुसरी गुणवत्ता यादी १३ जुलै २०१८ रोजी जाहीर केली जाईल. १४ ते १६ जुलै २०१८ दरम्यान दुसºया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. तिसरी गुणवत्ता यादी २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी २४ व २५ जुलै रोजी प्रवेश घ्यायचा आहे. चौथी गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी जाहीर होईल.कोटा प्रवेशासाठी २५ जूनपर्यंत मुदतविद्यार्थी ज्या शाळेत शिकला त्याच संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्यांना तिथे कोटा प्रवेश मिळू शकेल. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकूण प्रवेशक्षमतेच्या २० टक्के जागा त्यांच्या संस्थेतील दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोट्यांतर्गत उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागांचा कोटा उपलब्ध असेल. त्याबरोबर अल्पसंख्यांक संस्थांना वेगळा कोटा असेल. सर्वप्रकारच्या कोटा प्रवेशासाठी २५ जून २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोटा प्रवेश मिळणे शक्य असेल तर त्यांनी मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक आहे अन्यथा नियमित फेरीमधून प्रवेश घ्यावा लागेल.पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावा लागणार1 अकरावी प्रवेश अर्जामध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे १० पसंतीक्रम भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे मागील वर्षीचे कट आॅफ विचारात घेऊनच पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे.2विशेषत: पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाचे नाव टाकताना अत्यंत काळजीपूर्वक टाकावे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय विद्यार्थ्यास मिळाल्यास त्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल. त्याने तिथे प्रवेश न घेतल्यास त्याचा अर्ज प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल.

टॅग्स :educationशैक्षणिकcollegeमहाविद्यालयnewsबातम्या