शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अकरावीचे आजपासून प्रवेश, १३ जून ते ४ आॅगस्टपर्यंत प्रक्रिया  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:47 IST

केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे.

पुणे - केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग २ विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै २०१८ रोजी जाहीर करण्यात येईल,तर चौथ्या फेरीची शेवटची गुणवत्ता यादी २९ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध होईल.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळअखेरपर्यंत ६९ हजार ४२५ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अर्जाचा पहिला भाग भरला होता.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दुसºया भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरायचा आहे.बुधवारपासून या अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. अर्जाचे भाग १ व भाग २ भरून ते आॅनलाईन जमा करण्यासाठी २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावी अर्जाचा पहिला भागभरला नाही, त्यांना तो आता भरण्याचीही सुविधा २५ जूनपर्यंत उपलब्ध असेल.विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आॅनलाईन प्रसिद्ध केली जाईल. या यादीमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास अथवा चूक झाली असल्यास विद्यार्थ्यांना त्यावर ३० जून ते २ जुलै २०१८ पर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये लेखी हरकती नोंदविता येणार आहेत. या हरकतींची ३ जुलै रोजी छाननी करून निवारण केले जाईल.त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै २०१८ रोजी जाहीर केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ६ ते ९ जुलै २०१८ दरम्यान महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचाआहे. त्यानंतर १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.दुसरी गुणवत्ता यादी १३ जुलै २०१८ रोजी जाहीर केली जाईल. १४ ते १६ जुलै २०१८ दरम्यान दुसºया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. तिसरी गुणवत्ता यादी २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी २४ व २५ जुलै रोजी प्रवेश घ्यायचा आहे. चौथी गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी जाहीर होईल.कोटा प्रवेशासाठी २५ जूनपर्यंत मुदतविद्यार्थी ज्या शाळेत शिकला त्याच संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्यांना तिथे कोटा प्रवेश मिळू शकेल. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकूण प्रवेशक्षमतेच्या २० टक्के जागा त्यांच्या संस्थेतील दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोट्यांतर्गत उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागांचा कोटा उपलब्ध असेल. त्याबरोबर अल्पसंख्यांक संस्थांना वेगळा कोटा असेल. सर्वप्रकारच्या कोटा प्रवेशासाठी २५ जून २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोटा प्रवेश मिळणे शक्य असेल तर त्यांनी मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक आहे अन्यथा नियमित फेरीमधून प्रवेश घ्यावा लागेल.पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावा लागणार1 अकरावी प्रवेश अर्जामध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे १० पसंतीक्रम भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे मागील वर्षीचे कट आॅफ विचारात घेऊनच पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे.2विशेषत: पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाचे नाव टाकताना अत्यंत काळजीपूर्वक टाकावे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय विद्यार्थ्यास मिळाल्यास त्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल. त्याने तिथे प्रवेश न घेतल्यास त्याचा अर्ज प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल.

टॅग्स :educationशैक्षणिकcollegeमहाविद्यालयnewsबातम्या